दिशाभूल करणारी सत्ता बदलण्यासाठी डॉ. आशीष देशमुख यांनी निवडून द्या - मनीष तिवारी

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. दिशाभूल करणारी सत्ता बदलून टाकण्यासाठी डॉ. आशीष देशमुख यांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
दिशाभूल करणारी सत्ता बदलण्यासाठी डॉ. आशीष देशमुख यांनी निवडून द्या - मनीष तिवारी

नागपूर - महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. दिशाभूल करणारी सत्ता बदलून टाकण्यासाठी डॉ. आशीष देशमुख यांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

उद्योगांमध्ये गुंतवणूक नाही. त्यामुळे रोजगार निर्मिती नाही. जीएसटीमुळे व्यापारी खूश नाहीत. सरकार जनतेवर टॅक्‍स लावला आहे आणि चांगला टॅक्‍स लावला म्हणून ते आनंद व्यक्त करीत आहे. सरकारने चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केली. आर्थिक मंदी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आहे. हे सरकार व्यापारी विरोधी आहे. लोकांच्या हातचा रोजगार या सरकारने हिरावला असल्याचे ते म्हणाले. 

भाजपच्या काळात सर्वसामान्यांचे घामाचे पैसे बॅंकेतही सुरक्षित नाही. त्यावर डल्ला मारण्याचे काम केले जात असून, पीएमसी बॅंक घोटळ्याचाही त्यांनी उल्लेख केला. पीएमसी बॅंक बुडाल्याने तीन खातेधारकांचा मृत्यू झाला. सामान्यांचे पैसे या बॅंकेत आहेत. त्या पैशाचा वापर त्यांनाच करता येत नाही. याबद्दल राज्य आणि केंद्राने बोलणे अपेक्षित आहे. भाजपला देशाची अर्थव्यवस्था चालविता येत नाही. 

अर्थव्यवस्थेच्या चार मूलभूत गोष्टी आहेत. त्यात बॅंकेमधील बचत, खर्च, गुंतवणूक आणि रोजगार यांचा समावेश आहे. या चारही मूलभूत गोष्टींवर सरकारने घाला घातला. रोजगाराचा निर्देशांक गेल्या चाळीस वर्षांत सर्वांत वाईट स्तरावर आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांची क्रयशक्‍ती घटली आहे. भाजपने 2015 साली घोषणापत्रात पाच वर्षांत दहा कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन होते. ते पूर्ण करण्याचे सोडाच, पण आहे ते रोजगारही सरकारने संपविले आहेत. हीच परिस्थिती देशाची राहिल्यास काही महिन्यांनी अर्थव्यवस्था कोसळेल, असे भाकीतही तिवारी यांनी व्यक्त केले. 

पत्रकार परिषदेत प्रवक्ते आशीष दुआ, डॉ. आशीष देशमुख, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.

सांप्रदायिक तणावामुळे गुंतवणुकीत घट
गेल्या पाच वर्षांत देशात कुठलीही मोठी गुंतवणूक नाही. याला येथील सांप्रदायिक वातावरण जबाबदार आहे. भाजपच्या धोरणामुळे परदेशी गुंतवणूक घटली. राज्यातही मिहानमध्ये एकही नवा उद्योग सुरू झालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी 50 हजार रोजगार देणार होते. त्याचे काय झाले? असा प्रश्‍न खासदार मनीष तिवारी यांनी उपस्थित केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com