kishor-appa-patil-mla
kishor-appa-patil-mla

आठ दिवसात 'महाशिवआघाडी'चे सरकार : आ.किशोर पाटील

..

जळगाव : राज्यातील सत्तेचा तिढा निर्माण झाल्यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेल रिट्रीट मध्ये ठेवले होते.  बहुतांश आमदार आपआपल्या मतदार संघात आले आहेत.

  पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जनतेच्या हिताचाच निर्णय घेत आहे, राज्यात आठ दिवसात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल. राज्यातील शेतकरी व जनतेचे प्रश्‍न निश्‍चित सुटतील.


निवडणूकांचा निकाल लागल्यानंतर प्रथमच मुंबईला गेलेल्या शिवसेना आमदारांना मुंबईतच मुक्काम करावा लागला होता. प्रथम रंग शारदा नंतर हॉटेल रिट्रीट येथे त्यांच्या राहण्याची सुविधा करण्यात आली. या काळात राज्यातील सत्तेसाठी बऱ्याच नाटयमय घडामोडी घडल्या त्यामुळे त्यांचा हॉटेलमधील मुक्काम वाढला. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात चर्चेच्या फेरी होत आहे. 


अशा स्थितीत आमदारांना आपआपल्या मतदार संघात जाण्यासाठी हॉटेलमधून सुटी देण्यात आली. मात्र ही फक्त दोन दिवसासाठीच आहे. आमदारांना रविवार (ता.17) पुन्हा मुंबईत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी (ता.17) शिवसेना प्रमुख (कै.)बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यातिथी असल्याने सर्व आमदार शिवतीर्थावर हजर होणार आहेत.


आपआपल्या मतदार संघात परत आलेले आमदार मतदारांना भेटी देत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील  म्हणाले,राज्यात सरकार येण्याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार निश्‍चित येईल याचा आम्हाला विश्‍वास आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आम्ही सर्व आमदारांना सर्वअधिकार दिले आहेत. त्यामुळे ते राज्यातील जनतेच्या हिताचाच निर्णय घेतील याचा आम्हाला विश्‍वास आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवटीबाबत आमदार पाटील म्हणाले,  आमदारांना राष्ट्रपती राजवटीची भिती दाखविली जात आहे. ते अत्यंत चुकिची आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे काही हुकूमशाही नव्हे. उलट या काळात राज्यपाल राज्याचा कारभार सांभाळतात.अधिकाऱ्यांना आदेश देवून ते कामे करून घेत असतात.

मात्र या काळात जर कोणत्या पक्षाने बहुमतांचा दावा करून सरकार बनविण्याचा प्रस्ताव दिल्यास त्याला मंजूरी देवून त्यांना सरकार बनविण्यासाठी आमंत्रीत करतात.

त्यानुसार सरकार बनविण्यसाठी शिवसेना,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. त्यांची बोलणी अंतीम टप्प्यात असून येत्या आठ दिवसात राज्यात 'महाशिव आघाडीचे' सरकार येईलच, याचा आपल्याला विश्वास  आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com