राऊतांबद्दल राज ठाकरे यांनी केलेले भाकित खरे ठरणार ? पाटील यांच्या ट्विटमुळे चर्चा..

संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी...बाकी आम्हाला तर संजय राऊतांच्या चौकशीबद्दल विशेष काही वाटत नाही. या विषयाकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये. (Mla Raju Patil)
Raj Thackeray-Sanjay Raut-Mla Raju Patil, Mns News Mumbai
Raj Thackeray-Sanjay Raut-Mla Raju Patil, Mns News MumbaiSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांच्या अकटेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिवा येथील वक्तव्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. ईडी समोर आम्ही गप्प बसत नाही, अशी टिका खासदार राऊत यांनी (Raj Thackeray) राज ठाकरे यांच्यावर केली होती. त्यावर ठाकरे यांनी राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टीस करावी, असा खोचक सल्ला दिला होता. राऊत यांना अटक झाल्यानंतर (MNS) मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत आठवतंय का काही ? असा टोला लगावला आहे.

या ट्विटमुळे ठाकरे यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदार राजू पाटील यांच्या दिवा येथील विभागीय कार्यालयाचे उदघाटन १२ मार्चला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. (Maharashtra) ठाकरे यांनी पुण्यातील सभेत संजय राऊत यांची मिमिक्री करत टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी " आमचे राजकारण मिमिक्रीवर अवलंबून नाही, ईडी समोर आम्ही गप्प बसत नाही" अशा शब्दात पलटवार केला होता.

आता ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत अटक केल्यानंतर राज ठाकरे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. "त्यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी" असा सल्ला ठाकरे यांनी दिला आहे १२ एप्रिलला एका जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, "आज पवारसाहेब संजय राऊतांवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही." राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज यांच्या या वक्तव्याची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

राज यांच्या या वक्तव्यांवरुन राऊत यांच्या अटकेबाबत राज यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले होते, अशी चर्चा आता रंगली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी राऊत यांच्या अटकेवर ट्विट केले असून त्याचीही चर्चा होऊ लागली आहे. संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी...बाकी आम्हाला तर संजय राऊतांच्या चौकशीबद्दल विशेष काही वाटत नाही.

Raj Thackeray-Sanjay Raut-Mla Raju Patil, Mns News Mumbai
शिरसाट बदमाशाची औलाद, केसरकर गद्दार ; शिवसेनेचं नावं घेण्याची तुमची लायकी नाही..

या विषयाकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये. निष्पक्षपाती यंत्रणांना काम करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे ट्विट करत पाटील यांनी `विश्व प्रवक्ते... आठवतंय का काही...? आता कसं वाटतंय ? असा टोला लगावला आहे. हे ट्विट मनसे कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे. यामुळे राज यांच्या दिवा येथील वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com