Jayant Patil : हे केवळ घोषणाबाज सरकार, एकही ठोस निर्णय घेतला नाही !

देशात खरच न्याय व्यवस्था जिवंत आणि स्वतंत्र असेल, तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना न्याय नक्की मिळेल, असा उपरोधिक टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर केली. पण, त्यांपैकी एक छदामही त्यांना मिळाला नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकरिता या घोषणाबाज सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यात पूरपरिस्थिती, आणि अतिवृष्टीची स्थिती लक्षात घेत विधानसभेत विशेष प्रस्ताव ठेवत पीडित कुटुंब, शेतकऱ्यांना (Farmers) तातडीने मदत जारी करण्यासंदर्भात विरोधी पक्ष म्हणून मदतीची मागणी केली. राज्य सरकारने (State Government) मदतीची घोषणाही केली. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याला ही मदत मिळालेली नाही. मदतीच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे. सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका दिसत नाही. त्यामुळे अद्याप राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला शासनाने मदत दिली नाही, असा टोला राज्य सरकारला लगावला.

सत्ताधाऱ्यांनी न्यायव्यवस्थाही नियंत्रणात आणली..

राज्यासह देशातही शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांचे प्रकरण न्यायालयात आहे. सध्याची एकूण परिस्थिती आता जनतेपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे देशात न्याय व्यवस्था जिवंत असेल, तर या प्रकरणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना न्याय नक्की मिळेल, असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लगावला.

गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील एका आमदाराने आम्ही शिवसेनेच्या न्यायालयीन प्रकरणाला आणखी पाच वर्षे लांबवू शकतो, असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी न्यायव्यवस्थाही नियंत्रणात आणली आहे की, काय, अशी शंका येत आहे. तरीही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून देशात खरच न्याय व्यवस्था जिवंत आणि स्वतंत्र असेल, तर न्याय नक्की मिळेल, असे ते म्हणाले. आपण जिल्ह्यात पक्षाचे क्रियाशील सदस्य तयार करण्यासाठी व त्यांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आखला आहे. जिल्ह्यात तीन हजार क्रियाशील सदस्य तयार करण्याचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.

Jayant Patil
एकनाथ शिंदेंनी कामाला लागावं, पुजा-अर्चा करण्यासाठी वेगळा मंत्री नेमावा- जयंत पाटील

गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने निर्माण केलेल्या महाकाय मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने येथील रखडलेले भूसंपादनाचे काम चार पट दराने मोबदला देऊन लवकर पूर्ण करावे आणि नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला आमदार धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, शहराध्यक्ष विजय गोरडवार, युवक विभागीय अध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुटे, प्रदेश संघटक युनूस शेख आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com