Vijay Wadettiwar on Supreme Court Decision

Vijay Wadettiwar on Supreme Court Decision

Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ निर्णय म्हणजे आम्ही आणखी एक लढाई जिंकली...

केंद्राने या विषयात दाखवलेल्या अनास्थेमुळे ओबीसी समाजाचा भ्रमनिरास झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेला निर्णय खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय देणारा, हक्क देणारा निर्णय आहे.

चंद्रपूर : वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना 27 टक्के आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज येथे दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका सातत्याने दुटप्पी असल्याची टीका करण्यास मात्र ते विसरले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

घटनात्मक तरतूद असताना ते आजवर मिळाले नव्हते, हे लक्षात आणून देताना देशात ओबीसी पंतप्रधान सत्तेवर असताना करावा लागलेला हा संघर्ष अपेक्षाभंग करणारा असल्याचा टोला त्यांनी लगावला. ओबीसी बांधवांनी आणखी एक लढाई जिंकल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढलेली आहे. खरे पाहता केंद्र सरकारनेच हा निर्णय घेण्याची अपेक्षा होती, असेही वडेट्टीवार म्हणाले.

राज्याच्या वाट्याला ज्या १५ टक्के जागा मिळतात, त्या कोट्यातून २७ टक्के आरक्षण दिलं गेलं आहे. सारासार विचार करता देशात ओबीसींच्या जेवढ्या जागा असतात, त्यामध्ये २७ टक्के आरक्षण ओबीसींना नव्हतं आणि केंद्र सरकारची भूमिका याबाबत नेहमीच दुटप्पीपणाची राहिली आहे. केंद्राला हे आरक्षण द्यायचेच नव्हते, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यातील ओबीसी, व्हिजेएनटी अशा बहुजन समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर होण्याची संधी या निर्णयामुळे उपलब्ध होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Vijay Wadettiwar on Supreme Court Decision</p></div>
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘या’ कारणामुळे पुढे ढकलली कॅबिनेटची बैठक...

घटनेने ३४० व्या कलमानुसार या समाजाला अतिशय मागासलेला समाज म्हणून आरक्षणाची तरतूद केली होती. त्यासाठी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले पाहिजे. घटनेत ही तरतूद असतानासुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींच्या या आरक्षणासाठी झुंजावे लागले, लढावे लागले. देशाचे पंतप्रधान ओबीसी असल्यामुळे समाजाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्यांनी या विषयात दाखवलेल्या अनास्थेमुळे ओबीसी समाजाचा भ्रमनिरास झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय देणारा, हक्क देणारा निर्णय आहे. ओबीसींना आज जे काही मिळाले, सर्वोच्च न्यायालयामुळेच. ओबीसींनी पुन्हा एक लढाई जिंकली असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com