MLA Chandrashekhar Bawankule
MLA Chandrashekhar BawankuleSarkarnama

डिमांड भरूनही वीज कनेक्शन नाही आणि खासगी कंपन्यांसाठी मीटरचा कृत्रिम तुटवडा...

वीज मीटरच्या बाबतीतही लोकांनी रस्त्यावर उतरण्याची वाट राज्य सरकार बघत आहे का, असा सवालही आमदार बावनकुळे (MLA Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

नागपूर : ऊर्जा विभागाचे सध्या काय सुरू आहे, तेच कळायला मार्ग नाही. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असताना सातत्याने कोळसा नसल्याची ओरड केली जात आहे. सव्वादोन लाख ग्राहकांनी डिमांड भरली आहे, तरीही त्यांना कनेक्शन देण्यात आलेले नाही आणि खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी वीज मीटरचा तुटवडा निर्माण केला जात आहे, असे म्हणत माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ऊर्जा विभागावर सडकून टिका केली.

ऊर्जा मंत्रालय महावितरणच्या विद्युत निर्मिती कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रयत्नात आहे आणि मीटरचा तुटवडा त्याचाच एक भाग असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राज्यात (Maharashtra) वाढत्या तापमानामुळे विद्युत मीटरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर नवीन विद्युत मीटरची मागणी देखील वाढली आहे. हे मीटर महावितरणकडून उपलब्ध होणे अपेक्षित असताना ते बाजारपेठेतून विकत घेण्यास सांगितले जात आहे. अशाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून, हा अन्याय असल्याचे ते म्हणाले.

महावितरणकडून ज्या थ्री फेज मीटरसाठी १ हजार ५९६ रुपये घेतले जात होते, तेच मीटर आता बाहेरून विकत घेतल्यास ४ हजार रुपयांच्या घरात जाणार आहे. तर सिंगल फेज मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १ हजार ८०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. महत्वाचे म्हणजे बाजारातून मीटर विकत घेतल्यास त्याचे जोडणी शुल्क वेगळे द्यावे लागेल. आजच्या घडीला राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत तर २.२ लाख ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही.

MLA Chandrashekhar Bawankule
आमदार बावनकुळे म्हणाले, या चौकशीमागे खासगीकरणाचा वास...

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात विद्युत मीटरचा ऐतिहासिक तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी तो जाणीवपूर्वक निर्माण केला जात असल्याचा घणाघाती आरोप आमदार बावनकुळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे या सरकारने सुरू केले होते. मग शेतकरी रस्त्यावर उतरायला लागल्याने सरकारला जाग आली. आता वीज मीटरच्या बाबतीतही लोकांनी रस्त्यावर उतरण्याची वाट राज्य सरकार बघत आहे का, असा सवालही आमदार बावनकुळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com