युती सरकारने अनास्था दाखविली, पण महाविकास आघाडीने करून दाखवले…

काम करण्याची इच्छाशक्ती आणि प्रयत्नांतील सातत्य यांमुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने हे करून दाखवले, असे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
Vijay Wadettiwar, Minister, Mahavikas Aghadi Government

Vijay Wadettiwar, Minister, Mahavikas Aghadi Government

Sarkarnama

नागपूर : नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांतील ओबीसींची नोकरभरती आता सुरळीत होणार आहे. कारण ३ जानेवारी २०२२ रोजी सुधारित बिंदुनामावलीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. यासंदर्भात यापूर्वीच्या युती सरकारने अनास्थाच दाखविली होती. पण काम करण्याची इच्छाशक्ती आणि प्रयत्नांतील सातत्य यांमुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने हे करून दाखवले, असे मदत, पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली होती. पण यापूर्वीच्या सरकारने ओबीसींच्या या मागणीबाबत रस दाखविला नाही. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ओबीसींच्या अनेक प्रश्‍नांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली आणि या मागणीची दखल घेत त्वरित कार्यवाही सुरू केली. ८ जिल्ह्यांतील ओबीसींच्या नोकरभरतीचा मार्ग मोकळा केला. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींसाठी ६ टक्के आरक्षण होते, लोकसंख्या ४३.५० टक्के होती. अशीच काहीशी स्थिती इतर जिल्ह्यांमध्ये होती. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष होता. त्यामुळे मी स्वतः पुढाकार घेऊन वेळोवेळी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समिती गठीत केली. त्या समितीच्या अहवालावर त्वरित काम करून ओबीसी जनतेची मागणी पूर्ण करवून घेतली. या विषयात मी ओबीसी कार्यकर्ता म्हणून काम केले, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये गट-क व गट-ड संवर्गातील सर्व सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचे सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय १५ सप्टेंबर २०२१च्या मंत्रिमंडळात घेण्यात आला होता आणि लगेच २३ सप्टेंबर २०२१ रोजी याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला होता. संबंधित निर्णयाबाबतची सुधारित बिंदुनामावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आठही जिल्ह्यांतील ओबीसी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशीही माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांतील ओबीसींची नोकरभरती आता सुरळीत होणार आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी सुधारित बिंदुनामावलीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. सदर बिंदुनामावली, शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून म्हणजे २३ सप्टेंबर २०२१ पासून अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त असलेल्या नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी या सुधारित बिंदूनामावलीचा अवलंब करण्याची सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

<div class="paragraphs"><p>Vijay Wadettiwar, Minister, Mahavikas Aghadi Government</p></div>
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘या’ कारणामुळे पुढे ढकलली कॅबिनेटची बैठक...

अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या ८ जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचे सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड या ८ जिल्ह्यांमधील ओबीसींच्या आरक्षणात काही प्रमाणात वाढ झाली आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दीर्घकालीन लढा दिला आहे. हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे मोठे यश आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com