मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या कामांत सर्वसामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटेल…

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, आज आपण दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव साजरा करीत आहोत. राज्यावर आलेले मरगळ आता झटकली जात आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघेंचा (Anand Dighe) आशीर्वाद आपल्या सरकारला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

नागपूर : गेली दोन वर्ष आपल्यावर निर्बंध होते. पण यावर्षी आपण मुक्त वातावरणात सर्व सण साजरे करीत आहोत. याच मुक्त वातावरणात कामांना गती मिळतेय. आपल्या महाराष्ट्राकडे देशभरातील लोक आशेने बघतात. जनतेसाठीच आम्ही हे शिवधनुष्य पेलले आहे आणि लोकांचा भावना समजून घेऊन पुढे जाणारे हे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा देताना म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, आज आपण दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव साजरा करीत आहोत. राज्यावर आलेले मरगळ आता झटकली जात आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघेंचा (Anand Dighe) आशीर्वाद आपल्या सरकारला आहे. राजकारण करताना समाजकारणाला प्राधान्य द्या, अशी शिकवण बाळासाहेबांनी दिली, तर आनंद दिघेंनी लोकांच्या हक्कासाठी लढायला शिकवले आहे. शेतकरी, वंचित शोषीत, पीडित लोकांच्या विकासाचा ध्यास सरकारने घेतला आहे. पहिल्याच बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनीही (Devendra Fadanvis) ठामपणे हेच सांगितलं आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. प्रत्येकाच्या मनातले हे सरकार आहे. हे सांगताना आनंद होतोय. गेल्या तीन-चार महिन्यात सरकारची वाटचाल चांगली सुरू आहे.

आपत्तींनी डगमगलो नाही..

आलेल्या आपत्तीने आजपर्यंत डगमगलो नाही. त्यामुळेच चांगल्या योजना सुरू केल्या. अंमलबजावणीत अडचणी आल्या असतीलही. पण काम सुरू आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास योजना सुरू केली. १ कोटीपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत त्याचा लाभ घेतला. शिधापत्रिकाधारकांना आनंद शिधा १०० रुपयांत दिला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी एनडीआरच्या निकषांच्या दुप्पट मदत दिली. निकषात न बसणाऱ्यांना ३० लाख शेतकऱ्यांना ४ हजार कोटी देऊन दिलासा दिला. ७५५ कोटी रुपयांची मदत इतर शेतकऱ्यांना सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांवर भूविकास बॅंकेचे कर्ज होते, अशा शेतकऱ्यांना ९५० कोटींची कर्जमाफी दिली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच लाख कोटी रुपये जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

७५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू..

राज्यातील पदभरतीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, २०००० पोलिसांच्या भरतीने आम्ही पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांच्या घराच्या किमती ५० लाख रुपयांवरून १५ लाख रुपयांपर्यंत कमी केल्या. राज्यात ७०० बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करतोय. ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला २ कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी टप्पा लवकरच सुरू होणार..

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. सोबतच नागपूर-गोवा कॉरीडोरचे काम सुरू होणार आहे. एकट्या मुंबईतील विकास कामांसाठी एनएमआरडीए मार्फत ६० हजार कोटी रुपये खर्चून कामे केली जात आहेत. मुंबईत मेट्रोचे जाळे विणले आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी दूर होईल. केंद्र सरकारच्या नीती आयोगाप्रमाणे राज्यासाठी मित्र संस्था स्थापन केली आहे. मुख्यमंत्री वॉर रुममधून सर्व कामांचे मॉनिटरींग केले जात आहे. पायाभूत सुविधांना वेग देतो आहोत. मुंबईतील रस्त्यांसाठी साडेपाच हजार कोटीची तरतूद केली आहे. आता मुंबईतील बव्हंशी रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे तयार होणार आहेत.

Eknath Shinde
Shinde : विस्ताराबद्दल फडणवीसांनी सांगितले, पण एकनाथ शिंदे ठामपणे बोलले नाहीत !

लॉजिस्टिक पार्क लवकरच..

टाटा सोबत एमओयु केला आहे. त्याअंतर्गत लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. राज्यातल्या खेळाडूंसाठी नवे धोरण आखले आहे. जेणेकरून आपले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवतील. एकंदरीत सर्वच क्षेत्रांत कामाचा धडाका सुरू आहे. अनेक कामांना दिशा देण्याचे काम सुरू आहे. सरकारच्या कामांत सर्वसामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटेल, असा प्रयत्न आहे. महाराष्ट्र अग्रेसर आहे. विकासाची पताका महाराष्ट्र सदैव अग्रेसर

ठेवेल, याचा विश्‍वास आहे. त्याला आपली साथ आहे. हे नातं आणखी घट्ट होईल, असा विश्‍वास आहे. भावना समजून घेऊन पुढे जाणारे हे सरकार आहे. जनतेला सोबत घेऊन अहोरात्र काम करण्याची तयारी आहे. आपण ते अनुभवत आहातच. आपल्या सरकारला अजून मोठी मजल गाठायची आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेला दीपोत्सवानिमित्त निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com