विद्यार्थ्यांनो तयार रहा, शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत...

खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) म्हणाले कि, जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर नंतर चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
MP Balu Dhanorkar
MP Balu DhanorkarSarkarnama

नागपूर : राज्याला ऊर्जा देणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थी मुळातच ऊर्जावान आहेत. पण आपल्या चंद्रपूरसारख्या (Chandrapur) औद्योगिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे कौशल्य शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष होते आहे. भविष्यात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार रहावे आणि कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार धानोरकर म्हणाले, सद्यःस्थिती व भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांनी यूपीएससी, एम. पी. एस. सी. सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी जोमाने तयारी करावी. महाविद्यालयातूनदेखील यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. नोकऱ्यांची व बेरोजगारी ची भीषण समस्या लक्षात घेता व्यावसायिक शिक्षणावर भर देऊन स्वयंरोजगारात प्रोत्साहन तसेच बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल होणार आहेत. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. परंतु या उद्योगात कौशल्यपूर्ण शिक्षण घेणारे विद्यार्थी स्थानिक फार कमी असल्यामुळे बेरोजगारांची संख्या जास्त आहे. युवकांनी स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा.

काल शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) शैक्षणिक साहाय्यक संस्था चंद्रपूर संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस ५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अशोक घोटेकर, प्रा. राजेश दहेगावकर, कुणाल घोटेकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रितेश तिवारी, अनु दहेगावकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, सुनील पाटील, गोपाल अमृतकर, ताजुभाई, राज यादव यांची उपस्थिती होती.

MP Balu Dhanorkar
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर नंतर चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पावन स्पर्श या भूमीला लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला शिक्षणाचा अधिकाराचा वापर करून या भूमीतून सर्वाधिक युवक येत्या काळात प्रशासकीय सेवेत जाण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com