सोनियाजींनी विकृती खपवून घेऊ नये; मि. नटवरलाल पटोलेंना मनोरुग्णालयात पाठवावे…

कॉंग्रेस (Congress ) आणि भाजपचे (BJP) राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी, नाना पटोलेंचे असे वागणे बरोबर नाही, असेही ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule, Nana Patole and Soniya Gandhi
Chandrashekhar Bawankule, Nana Patole and Soniya GandhiSarkarnama

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गांधीजींची हत्या म्हणण्याऐवजी ‘वध’ असा शब्दप्रयोग केला. ते सातत्याने महापुरुषांचा अवमान करणारे वक्तव्य करीत सुटले आहेत, त्यांची ही विकृती सोनिया गांधी का खपवून घेत आहेत, प्रश्न करीत त्यांनी मि. नटवरलाल पटोलेंना मनोरुग्णालयात पाठवावे, अशी मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

यावर बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले की, मि. नटवर. सोनिया गांधी (Soniya Gandhi) त्यांची ही विकृती का खपवून घेत आहेत. त्यांना मनोरुग्णालयात पाठवावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस लाल पटोले यांना मनोरुग्णालयात पाहिजे. त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्याची गरज आहे. जाणीवपूर्वक ते वादग्रस्त वक्तव्य करीत असतात. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना पदावरून हटवावे. नाहीतर अल्पावधीतच त्यांचा येवढा जुना पक्ष संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रेस आणि भाजपचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी, नाना पटोलेंचे असे वागणे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हटलंय पत्रात…

‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री नाना पटोले हे सातत्याने समाजविघातक वक्तव्य करून सामाजिक शांतता बिघडवीत आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जेथे असते, तेथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्र यावे, हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहीत आहे. पटोलेंनी अलीकडच्या काळात दोन मोठी वादग्रस्त विधाने केली आहे. या विधानांमुळे समाजमन संतप्त आहे.

पटोलेंनी काही दिवसांपूर्वी देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजातील सर्व क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सर्वत्र त्यांचा निषेध केला गेला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही, ही सामान्य गोष्ट जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

Chandrashekhar Bawankule, Nana Patole and Soniya Gandhi
बावनकुळे म्हणाले, सीताराम कुंटे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे वास्तव समोर आले...

या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल पटोले यांनी माफीदेखील मागितलेली नाही. कॉंग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचा एक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर अपमान करतो आणि कॉंग्रेस पक्ष त्या प्रदेशाध्यक्षाच ही विकृती खपवून घेतो, ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे. पटोले असा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करीत आहेत. अशा बेजबाबदार व्यक्तीवर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने बरखास्त करावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करीत आहे.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com