निर्णय घेण्याचा अधिकार सोनियाजींचा आहे, असं वाटत होतं...पण? : पवारांचा नानांना टोला

हाच आग्रह सोनियाजींचादेखील Soniya Gandhi आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या बैठकीत त्याचा निर्णय होईल, असे त्यांनी Sharad Pawar सांगितले.
Sharad Pawar and Nana patole
Sharad Pawar and Nana patoleSarkarnama

गडचिरोली : विदर्भात कॉंग्रेसची एकच दुकान आहे, अन् ती सुद्धा बंद पडणार आहे. असे वक्तव्य नाना पटोले यांनी बुलडाणा येथे केले होते. याबाबत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता, नाना पटोले काहीही बोलू शकतात, आम्ही नाही बोलू शकत. कारण आम्ही आमची संघटना आणि सरकार दोन्ही चालवायचे आहे, असा टोला पवारांनी नाना पटोले यांना हाणला.

मला असं वाटत होतं की, कॉंग्रेसमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीच्या नेत्यांना आहेत, पण आता चंद्रपूर, भंडारा, गोंदियाचे नेते कॉंग्रेसचे निर्णय घेतात, असा पुन्हा एक टोमणा पवारांनी पटोलेंना हाणला. राज्यात शिवसेना क्रमांक १ वर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या तर कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि तीन पक्षांचे हे संघटन फारच जबरदस्त झालेले आहे. राष्ट्रीय पातळीवर जेव्हा आम्ही लोक एकत्र बसतो तेव्हा, ‘आपण एकत्र येऊन पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असे सर्वच नेते बोलतात. त्या विचारावर राज्यात महाविकास आघाडी तयार झाली. आता पटोलेंनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्‍न आहे, असे पवार म्हणाले.

पवार यांनी पटोलेंचे नागपुरातील जुने दुकान बंद केले. त्यावर नाना पटोलेंनी ‘आम्ही बारामतीत आलो तर...’, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर बारामतीमध्ये प्रत्येकाचे स्वागत आहे. त्यांनी यावे आणि त्यांच्या पक्षाचा विस्तार करावा, आमचे काहीही म्हणणे नाही. त्यांना शुभेच्छाच आहेत, असे पवार म्हणाले. पटोले सातत्याने एकटे लढण्याची भाषा करीत आहेत. याबाबत विचारले असता, आम्हाला संघटना चालवायची आहे आणि राज्यसुद्धा चालवायचे आहे. हाच आग्रह सोनियाजींचादेखील आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या बैठकीत त्याचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar and Nana patole
गडचिरोली शहराच्या वेशीवर आले वाघ

विदर्भाचा दौरा करीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसची काय स्थिती आहे, असे विचारले असता, विदर्भात आमची काय स्थिती हा आमचा अंतर्गत प्रश्‍न आहे, असे म्हणत त्यांनी हंशा पिकवला. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अनुकूल स्थिती आहे. येथे पक्ष वाढण्यास मोठा वाव आहे, असे पवारांनी सांगितले. शेतकऱ्यांना या परिस्थितीत आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. सरकारची आर्थिक ताकद कमी आहे. पण कर्ज ते काढून शेतकऱ्यांना मदत करू शकतात. याबाबत येथून गेल्यावर मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि विदर्भातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com