नाना पटोले खरेच मुख्यमंत्र्यांनी बोलणार नाहीत?

आता प्रभागात तीन सदस्य राहतील, असा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्यामुळे नाना Nana Patole आता खरंच मुख्यमंत्र्यांशी The Chief Minister बोलणार नाहीत.
Mahavikas Aghadi Logo
Mahavikas Aghadi LogoSarkarnama

नागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे महाविकास आघाडीत ठरल्यानंतर प्रभाग एक किंवा फार फार तर दोन सदस्यांचा असावा, असे कॉंग्रेसचे म्हणणे होते. याला शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध होता. या विषयावर चांगलेच काथ्याकूट झाल्यानंतर महानगर पालिकांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होणार असून एक प्रभागात तीन सदस्य राहतील. राज्य शासनाने कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काल काढला.

राज्य शासनाने हा अध्यादेश काढल्यामुळे कॉंग्रेसचा चांगलाच जळफळाट होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग पद्धतीने होणार असलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग तीन सदस्यांचा राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा परवा जाहीर केले होते. तेव्हा आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. आता तर प्रभागात तीन सदस्य राहतील, असा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्यामुळे नाना आता खरंच मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

काल काढलेला अध्यादेश म्हणजे कॉंग्रेसच्या विरोधाला न जुमानता शिवसेना, राष्ट्रवादीने केराची टोपली दाखविल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई वगळता इतर महानगर पालिकांसाठी हा कायदा लागू असणार आहे. मुंबईत वार्ड पद्धती म्हणजे एक सदस्यीय प्रभाग असणार आहे. मागील निवडणुकासुद्धा प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या. एक प्रभागात चार सदस्य होते. परंतु याचा अनुभव नागरिकांना फारसा चांगला नाही. राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारने वार्ड पद्धती म्हणजे एक सदस्यीय प्रभागानुसार निवडणुका घेण्याची निर्णय घेतला होता. तसा कायदाही पारित केला. पुढील वर्षी या निवडणुका होणार आहे.

Mahavikas Aghadi Logo
नाना पटोले उद्या अमेरिकेच्या अध्यक्षांवरही बोलू शकतील…

त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करण्याचे निर्देशसुद्धा दिले. प्रशासनाकडून तयारीही सुरू करण्यात आली आहे. सत्ता असल्याने बंडखोरीची लागण होण्याच्या भीतीने तीनच्या प्रभागानुसार निवडणूक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु याला कॉंग्रेसने विरोध दर्शविला होता. कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उघडपणे या निर्णयाचा विरोध केला होता. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनचा प्रभाग करण्याची मागणी आधीच केली होती. परंतु आता तीन सदस्याच्या प्रभागावर शासनाने कायद्याची मोहर उमटवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com