Fadanvis : नागपुरात सुरू होणार मेट्रोचा दुसरा टप्पा, गडचिरोलीत धावणार नियो मेट्रो !

यात विदर्भातील (Vidarbha) आदिवासीबहूल गडचिरोली (Gacdhiroli) जिल्ह्याचाही समावेश करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मेट्रो नागपुरात मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बर्डी ते ऑटोमोटीव्ह चौक आणि बर्डी ते पार्डी नाका हे दोन मार्ग लवकरच सुरू होणार आहेत. आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाय गडचिरोलीमध्ये नियो मेट्रो सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मेक इन इंडिया (India) या उपक्रमांतर्गत देशातील कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नियो मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. यात विदर्भातील (Vidarbha) आदिवासीबहूल गडचिरोली (Gacdhiroli) जिल्ह्याचाही समावेश करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली.

फडणवीस म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्राची मंजुरी घेण्यात येणार आहे. तत्वतः मंजुरी यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. दुसरा टप्पा ४३.८ किलोमीटर लांबीचा आहे. कापसी येथील ट्रांसपोर्ट नगर ते हिंगणा, उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसी मेट्रो पोहोचेल. दुसऱ्या टप्प्याचा आराखडा आधीच तयार करण्यात आला आहे. यात थोडाफार बदल केला जाणार आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या बाजूलाच हाय स्पिड ट्रेन धावणार आहे. येथे मालवाहतुकीसाठी लॉजिस्टिक कॉरिडॉर उभारला जाईल.

Devendra Fadanvis
‘वैभव नाईक कितीही मोर्चे काढा; हे शिंदे-फडणवीस सरकार आहे, चुकीला माफी नाही’

पतंजलीचा प्लांटही लवकरच सुरू करण्याच्या प्रयत्न आहे. मिहानमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. मोठमोठे उद्योजक नागपूरमध्ये येण्यास उत्सुक आहेत. असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स विदर्भात उभारण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. मध्यंतरी ते चंद्रपूरला येऊन गेले. त्यावेळी त्यांनी यास तत्वतः मान्यता दिली. रिफायनरी विदर्भात आणली जावी अशी मागणी सातत्याने उद्योजकांमार्फत केली जात आहे. मात्र रिफायनरी समुद्र तटावरच अधिक व्हायबल आहे. त्यामुळे या बाबत सध्याचा काही सांगता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com