Ravikant Tupkar : कितीही दडपा; आंदोलन सुरूच ठेऊ, पुढची लढाई आरपारची असेल...

Police : पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला व विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले होते.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

Ravikant Tupkar News : पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या बळावर कितीही अतिरेक केला तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आंदोलन बंद करणार नाही. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू व आंदोलन सुरूच ठेवू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते रविकांत तुपकर म्हणाले.

पुढील आंदोलन हे आरपारचा लढा असेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी अकोला येथील कारागृहातून बाहेर निघताच दिला. बुलढाणा येथे आत्मदहन आंदोलनानंतर पोलिसांनी तुपकर व त्यांच्या २५ साथीदारांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. यादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला व विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने तुपकर व त्यांच्या २५ साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, श्री

विकांत तुपकर व त्याच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाल्याने आज त्यांना कारागृहातून सोडण्यात आले. यावेळी बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते हजर होते. पत्नी शर्वरी व त्यांच्या आईंनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना तुपकर म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन मात्र सुरूच राहील.

जोपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी बोलताना केला. रविकांत तुपकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तुपकर यांची १४ चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. तुपकरांसह त्यांच्या २५ सहकाऱ्यांनासुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तुपकर तीन दिवस भूमिगत होते. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आक्रमक झाले होते. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर भडकले; म्हणाले, तुमची कार्यालये जाग्यावर ठेवणार नाही..!

शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ते चार दिवसांपासून गायब होते. गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी १० तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा ११ फेब्रुवारीला बुलढाणा (Buldhana) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केला. दरम्यान पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com