रवी राणांची तलवार म्यान, बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार; म्हणाले कार्यकर्ता माझा आत्मा !

या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना आमदार राणा (MLA Ravi Rana) म्हणाले, या विषयात शब्दांतून शब्द वाढत गेला आणि प्रकरण वाढत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दोघेही माझे नेते आहेत.
Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu and Ravi RanaSarkarnama

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर बऱ्यापैकी निवळल्यासारखा वाटत आहे. कारण रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करून तलवार म्यान केली आहे. तर बच्चू कडू यांनी अद्यापही माघार घेतलेली नाही. आज सायंकाळी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून उद्या अमरावतीमध्ये आपली पुढील भूमिका जाहीर करू, असे त्यांना माध्यमांना सांगितले.

या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना आमदार राणा (MLA Ravi Rana) म्हणाले, या विषयात शब्दांतून शब्द वाढत गेला आणि प्रकरण वाढत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी आम्हा दोघांनाही बोलावले, जवळपास तीन ते साडेतीन तास बैठक आमच्या बैठक झाली. आमच्यात मतभेद होते. पण अनेक गोष्टी ज्या बोलल्या गेल्या, त्या न पटणाऱ्या होत्या. बच्चू कडू (Bacchu Kadu) माझ्यासोबत अमरावती (Amravati) जिल्ह्यात आमदार आहेत. आम्ही दोघंही सरकारसोबत आहोत. बोलता बोलता गुवाहाटीच्यासंदर्भात माझ्याकडून काही अपशब्द बोलले गेले, त्याबाबतीत मी दिलगिरी व्यक्त करतो आणि शब्द मागे घेतो.

बच्चू कडू यांच्या तोंडूनही अपशब्द निघाले आहेत. मी खिसे कापून किराणा वाटतो, असे जे त्यांनी म्हटले, ते चुकीचे आहे. मी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता त्यांनी शब्द मागे घ्यायला हवे आणि ते घेतली, अशी अपेक्षा आहे. आम्ही दोघेही सरकारचे घटक आहोत. आमच्या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास, प्रगती महत्वाची आहे. आता एक ताकतवर सरकार राज्यात उभी आहे. सर्व प्रकल्प मार्गी लावण्याचे काम तीन महिन्यांत आमच्या सरकारने केले आहे. शेतकरी, शेतमजूर सर्वांचे प्रश्‍न ते वेगाने मार्गी लावत आहेत. माझ्या शब्दांनी इतरांचीही मन दुखावली असतील, तर मी माझे शब्द मागे घेऊन हा विषय संपवीत आहे, असे आमदार राणा म्हणाले.

माझ्याकडून या वादावर पदडा टाकतो, असेही ते म्हणाले. कधी चूक झाली तरी आपले शब्द मागे घेतले पाहिजे, या मताचा मी आहे. त्याच पद्धतीने मी काम करतो. कधी दोन पावले मागे घ्यावी लागतात, आज मी नेमके तेच करीत आहे. फडणवीस माझे नेते आहेत, त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्वी आहे. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी तीन ते साडेतीन तास बैठक घेतली. त्यांनी अनेक मोठे विषय मार्गी लावले आहेत, हा तर छोटासा विषय आहे. आमच्या भांडणात इतर लोक जे राजकीय पोळ्या शेकत आहेत, ते आता बंद होणार आहे.

Bacchu Kadu and Ravi Rana
Sudhir Mungantiwar : रवी राणा आणि बच्चू कडू, या दोघांच्याही भूमिकेचे स्वागत !

अडीच वर्ष आमचे सरकार नसल्यामुळे राज्याला काय भोगावे लागले, हा आपण पाहिलेच आहे. आमचे दोन्ही नेते तळागाळातील आहेत. मजबूत सरकार आमच्यासाठी महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा गेल्या तीन महिन्यात शिंदे-फडणवीसांनी केले आहे. देसाईंना मातोश्रीवर मलिदा पोहोचवला.. अडीच वर्षात किती प्रकल्प राज्याबाहेर गेले, हे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई किंवा उद्धव ठाकरेंनी सांगावे, असे आवाहन रवी राणा यांनी केले. एमआयडीसीतील भूखंड देसाईंनी धनदांडग्यांच्या खिशात टाकले आणि त्याचा मलिदा मातोश्रीवर पोहोचवला, असा घणाघाती आरोपही आमदार राणा यांनी केला.

कार्यकर्ता माझा आत्मा - बच्चू कडू

शिंदे फडणवीसांनी मध्यस्थी केली आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले, याबद्दल त्यांचे आभार. आज सायंकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहो. त्यानंतर उद्या आमचा जाहीर मेळावा आहे. राज्यभरातले कार्यकर्ते येणार आहेत. तेथे चर्चा करून आमची पुढील भूमिका आम्ही स्पष्ट करू. माझा आत्मा माझा कार्यकर्ता आहे. आज सायंकाळी बैठक घेऊ. हा वाद व्हायलाच नको होत. जे काही आरोप होते, ते राणांनी केले होते. मी स्वतःहून वाद केलेला नाही. जे काही आहे, ते तिकडून बोलले गेले आहे. मी अयोग्य केले, असे मला वाटत नाही.

या वादातच आयुष्य घालवायचे का, हा प्रश्‍न आहे. यापेक्षा सकारात्मक कामात आपली शक्ती लावावी, असे मला वाटते. या वादामुळे इतर महत्वाचे प्रश्‍न बाजूला राहिले होते. आमच्या व्यक्तिगत वादात महाराष्ट्राचे विषय अडकता कामा नये. माझ्यासाठी ते आरोप बरबादी करणारे होते. त्यामुळे मी आवाज उठवला. हा कार्यकर्त्यांचा आवाज होता. शिंदे-फडणवीसांसोबत झालेली चर्चा आज सायंकाळी कार्यकर्त्यांना सांगणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका ठरवणार आहे. कारण माझ्या समाधानापेक्षा कार्यकर्त्यांचे समाधान महत्वाचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com