
अमरावती : 'मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा' हा वाद राज्यभरात पेटला आहे. अशातच या वादात काही दिवसांपूर्वी अमरावीतचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या दाम्पत्यांनेही उडी घेतली आहे. यापूर्वी अमरावतीमध्ये हनुमान चालिसांचे पठण आणि मंदिरांमध्ये भोंग्याचे वाटप त्यांनी केले होते. यानंतर आता त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानी धडक देवून तिथे हनुमान चालिसा पठणं करण्याचा इशारा दिला आहे.
रवी राणा म्हणाले, महाराष्ट्र संकटामध्ये आहे, अशा संकटातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी. पण हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर उध्दव ठाकरे यांनी हनुमान चालीसाला विरोध केला. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेले संकट नष्ट झाले पाहिजे, मुख्यमंत्र्यांना शक्ती मिळाली पाहिजे, मुख्यमंत्रीनी विदर्भामध्ये येणे आणि मंत्रालयात जाणे सुरू केले पाहिजे, शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला विकास झाला पाहिजे यासाठी मी अमरावती वरून रेल्वेने २२ एप्रिल रोजी मुंबईला मातोश्रीवर जाण्यासाठी निघणार आहे आणि २३ एप्रिल रोजी हजारो कार्यकर्त्यांसह हनुमान चालीसा वाचणार आहे.
दरम्यान या वादावर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी टीका केली, रवी राणा यांचा हा स्टंट दिसत आहे. हे सर्व काही ते केवळ प्रसिद्धीसाठी करत आहेत. मातोश्रीवर जाणं कोणाचंही काम नाही. सगळ्या सुरक्षेमधून रवी राणा तिथं पर्यंत पोहचू शकणार नाहीत. मुळात तिथं शिवसैनिकच रवी राणा यांना जाऊ देणार नाहीत, त्यांच्यातून आधी त्यांनी वाट काढून दाखवावी असे आव्हानही वानखेडे यांनी दिले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.