Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा 'मन की बात' करण्यासाठी नाही ; मोदींना डिवचलं!

Rahul Gandhi : तुमचा आवाज, तुमची वेदना, समजून घेण्यासाठी भारत जोडो यात्रा.

शेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रात बुलढाण्यातील शेगावपर्यंत पोहोचली. शेगावमध्ये राहुल गांधी यांची विराट सभा झाली. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रा मन की बात करण्यासाठी नाही, तर तुमचा आवाज ऐकण्यासाठी आहे, असे उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हणत, त्यांनी पंतप्रधान मोदींना डिवचण्याची संधी सोडली नाही.

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra : नक्षली विचार ते आमदार; भारत जोडो यात्रेतल्या सीताक्काची कहाणी!

संत गजानन महाराज की जय, अशा घोषणेने राहुल गांधीनी भाषणास सुरूवात केली. विरोधकांनी मला विचारलं की, ही यात्रा नेमकी कशासाठी आहे. या यात्रेतून काय साध्य होणार आहे? मी त्यांना सांगतो की, भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेषपूर्ण वातावरण पसरवले आहे. हिंसा पसरवलेली आहे. भीती आणि दहशत पसरवलेली आहे. या तिरस्कराच्या विरोधातच ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra : नक्षली विचार ते आमदार; भारत जोडो यात्रेतल्या सीताक्काची कहाणी!

"भारत जोडो यात्रा ही मन की बात करण्यासाठी नाही तर तुमचा आवाज, तुमची वेदना, समजून घेण्यासाठी आहे. तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी आहे. भिती, दहशत, तिरस्कार, हिंसा यामुळे देशाचं नुकसान होतं. द्वेषाने या देशाचा काहीच फायदा होणार नाही", अशा शब्दात त्यांनी मन की बात कार्यक्रमाचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे डिवचलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com