तुम्ही कितीही करा दावा, या तुम्ही परत आपल्या गावा; आठवलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा...

अग्निपथ योजनेच्या संदर्भात तरुणांच्या मनांत अनेक संभ्रम आहेत, त्यामुळे या योजनेच्या नियमांत बदल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले.
Ramdas Athavale and Uddhav Thackeray
Ramdas Athavale and Uddhav ThackeraySarkarnama

अकोला : विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मुंबई येथे मतदान सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षामध्ये या निवडणुकीवरून मोठा संघर्ष पेटला आहे. आजही दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अकोला (Akola) येथे एका विवाह संमारंभात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अकोला महानगरपालिकेसह (Municipal Corporation) राज्यातील आगामी महापालिका निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हे भाजप सोबत लढणार असल्याची भूमिका आठवलेंनी स्पष्ट केली. यासोबतच नूपुर शर्मा आणि अग्निपथ या संदर्भातही त्यांनी मत मांडले. अग्निपथ योजनेच्या संदर्भात तरुणांच्या मनांत अनेक संभ्रम आहेत, त्यामुळे या योजनेच्या नियमांत बदल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले.

तुम्ही कितीही करा दावा, या तुम्ही परत आपल्या गावा.. अशी कविता सादर करून रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून निशाणा साधला आहे. आठवले म्हणाले सर्व विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Ramdas Athavale and Uddhav Thackeray
रामदास आठवले पटोलेंना म्हणाले, 'हिंमत असेल तर सत्तेमधून बाहेर पडा'

विधान परिषद निवडणुकीसाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर ५ वाजता मतमोजणी सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्यापर्यंत २७५ आमदारांचे मतदान झाले आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष या दोहोंच्या दाव्यांत किती दम आहे, हे आज सायंकाळपर्यंत कळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनातून परत गेले आहे. सायंकाळी निकाल लागेपर्यंत दावे प्रतिदावे सुरूच राहणार आहे. या मतदानावर कुणी आक्षेप घेतला नाही, तर एक ते दीड तासात निकाल हाती येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com