'मनसेने कितीही विरोध केला तरीही ते भारत जोडो यात्रा रोखू शकत नाही'

Bharat Jodo Yatra| मनसे हा एक स्टंटबाज पक्ष आहे. भारत जोडो यात्रेला विरोध हा देखील त्यांचा एक स्टंट असल्याचा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी लगावला आहे.
Bharat Jodo Yatra|
Bharat Jodo Yatra|

शेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाने राज्यात राजकीय वादात पुन्हा एक ठिणगी पडली आहे. यानंतर राहुल गांधी यांची शेगावमधील सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला (Congress) धडा शिकवणार असल्याचा चंग मनसेने बांधला आहे.

तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर थेट, मनसे कोण? असा उपरोधी टोला लगावत,ते आम्हाला काळे झेंडे दाखवणार असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मनसेने कितीही विरोध केला तरीही ते भारत जोडो यात्रा रोखू शकत नाही, हे राहुल गांधींनी आधीच स्पष्ट केलय. शेगावच्या सभेसाठी काँग्रेसने मोठी तयारी केली, राज्यभरातून मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते पोहोचत असल्याचे नाना पटोल यांनी म्हटलं आहे. तर मनसे हा एक स्टंटबाज पक्ष आहे. मनसे हा एक स्टंटबाज पक्ष आहे. भारत जोडो यात्रेला विरोध हा देखील त्यांचा एक स्टंट असल्याचा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी लगावला आहे.

Bharat Jodo Yatra|
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसाठी काय पण.., राजकीय लाभाचे पद नसतानाही शेतकऱ्याचे असेही प्रेम !

तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे. ''भारत जोडो यात्रा ही भूतो न भविष्यती अशी आहे. या यात्रेची देशाच्या इतिहासात नोंद होईल असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. आज शेवगावात मोठी सभा होणार आहे. संबंध महाराष्ट्रातून या यात्रेसाठी कार्यकर्ते आले आहेत. विरोधकांनाबही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यावर कायदेशीर प्रक्रिया होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

यावर '' यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं गालबोट लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरु आहे. अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. यात्रेला लोकांचा खुप मोठा पाठिंबा आहे. सामान्य लोकही या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यांच्या व्यथा आणि अडचणी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. राहुल गांधीदेखील जवळून प्रत्येकाकडून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या यात्रेतून देशात प्रेमाचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे अशा किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com