Bageshwar Maharaj News: पोलिसांनी कारवाई केली नाही, चमत्काराचे दावे करणाऱ्या बागेश्र्वर महाराजांचा ‘आका’ कोण?

Police News: सहायक पोलिस आयुक्त रोशन पंडित यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार करूनही कारवाई झाली नाही.
Bageshwar Maharaj, Nagpur
Bageshwar Maharaj, NagpurSarkarnama

Nagpur News : दिव्यशक्ती आणि चमत्काराचे दावे करणारे बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्णजी महाराज यांची जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रधान दक्षता अधिकारी व सहायक पोलिस आयुक्त (Police Commissioner) रोशन पंडित यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे सरकार अंधश्रद्धेला प्रोत्साहन करीत आहे का, असा प्रश्‍न अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केला.

नागपुरातील (Nagpur) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात धीरेंद्र महाराजांच्या दिव्य दरबारची पोलखेल यावर प्रा. श्याम मानव यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिष देशमुख, शरद पाटील, सुरेश झुरमुरे व प्रशांत सपाटे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. मानव म्हणाले, धीरेंद्र महाराज यांचे नागपुरात रामकथा प्रवचन झाले. ते १३ जानेवारीपर्यंत नागपुरात राहणार होते. रामकथा दरम्यान त्यांनी ‘दिव्य दरबार’ आणि ‘प्रेत दरबार’ आयोजित करणार असल्याचे घोषित केले होते. यू ट्यूबवर त्यांचे यासंदर्भातील अनेक व्हिडिओ आहेत. यात त्यांनी चमत्कार करण्याची भाषा वापरली आहे. हा प्रकार जादूटोणा विरोधी कायदा आणि ड्रग्ज ॲण्ड मॅजिक रेमेडीज कायद्याचे उल्लंघन करणारा आहे.

याची तक्रार सहायक पोलिस आयुक्तांकडे केली. त्यांना सर्व पुरावे आणि कायद्याच्या बाबी समजावून सांगितल्या. मात्र, धीरेंद्र महाराज नागपुरातून पळून गेले. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही. पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? धीरेंद्र महाराजांचा ‘आका’ कोण आहे. असा सवाल त्यांनी जाहीर सभेत केला. प्रास्ताविक सुरेश झुरमुरे यांनी केले. तर संचालन प्रशांत सपाटे यांनी केले.

Bageshwar Maharaj, Nagpur
Nagpur News: अंनिसचे आव्हान न स्वीकारताच पळाले धीरेंद्र कृष्ण महाराज...

दिव्य शक्ती असेल तर सिद्ध करा..

महाराजांनी प्रवचन संपण्याआधीच नागपुरातून पळ काढला. त्यांचा दिव्यशक्तीचा दावा खरा असेल तर त्यांनी पुन्हा नागपुरात परत यावे. आमच्या पंचासमोर त्यांनी चमत्काराचे सर्व दावे खरे करून दाखवावे. आम्ही त्यांना परत ३० लाखाचे बक्षीस देऊ. त्यांचे दावे खरे ठरले तर मी जाहीर माफी मागणार आणि माथा टेकणार, असे आव्हान प्रा. मानव यांनी केले. सरकारने लोकांना फसवणुकीपासून वाचविले पाहिजे, असेही ते म्हणाले.

कोट्यवधींची संपत्ती आली कुठून ?

अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र, धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात लढणारी आहे. धीरेंद्र महाराजांनी चमत्काराचे दावे करून लोकांची फसवणूक केली आहे. अशा या २६ वर्षाच्या महाराजांकडे कोट्यवधींची संपत्ती आली कुठून? असा सवाल शरद पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून केला. अंधश्रद्धा पसरवून सामान्य लोकांची लूट करणाऱ्या अशा प्रवृत्ती विरोधात आमचा लढा असून हे समाजाचे शत्रू असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com