नागपूर : भाजपच्या (BJP) केंद्रीय संसदीय मंडळातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान न दिल्यावर राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर गडकरींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ''कोणाचा वापर करुन गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका'' असे म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
नागपूरमध्ये (Nagpur) आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण दिले. ते म्हणाले, व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा, राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क कसा वाढता राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला गडकरी यांनी दिला.
जे ही कोणी व्यवसायात, सामाजिक कार्यात किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद असते. एखाद्याचे चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.