मुंबईला एमएपीएससीचे कार्यालय दिले, विभागनिहाय उपकार्यालये केव्हा?

राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
MPSC Ajit Pawar
MPSC Ajit PawarSarkarnama

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभार आत्तापर्यंत भाड्याच्या इमारतीतून चालत होता. पण आता हे कार्यालय स्वमालकीच्या स्वतंत्र इमारतीमध्ये जाणार आहे. मात्र, हे कार्यालय देताना, विभागनिहाय उपकार्यालये देण्यावर निर्णय केव्हा? असा सवाल आता विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकताच अर्थसंकल्प (Budget) सादर केला. त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या राजधानीत हे कार्यालय स्थापन झाल्यावर एमपीएससीचा (MPSC) कारभार अधिक लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय आपल्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवीन मुंबईत (Mumbai) महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणाही अजित दादांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.

एमपीएससीच्या विविध जागांसाठी राज्यामधून लाखो विद्यार्थी अर्ज करतात. त्यांना काही अडचण येतात. याशिवाय परीक्षा व प्रक्रियेसंदर्भातील प्रश्‍न सोडविण्यासाठी थेट मुंबई गाठावी लागते. त्यासाठी येणारा खर्च मोठा असतो. त्यामुळे नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण अशी विभागीय कार्यालये तयार केल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे ठरू शकते. त्यामुळे यावर निर्णय घेणे सरकारकडून अपेक्षित होते. मात्र, त्याबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. दुसरीकडे महाज्योतीचे विभागीय कार्यालय औरंगाबाद आणि नाशिक देण्यात आले आहे. त्यामुळे अशाच प्रकारे एमपीएससीचेही विभागीय कार्यालय देण्यात येणे गरजेचे आहे.

MPSC Ajit Pawar
'एमपीएससी'च्या चुकीची शिक्षा हजारो उमेदवारांना; न्यायालयात गेलेल्यांनाच न्याय

कारभारात सुसूत्रता यावी..

गेल्या काही परीक्षांच्या पेपरमध्ये चुकीचे प्रश्‍न आले. या प्रश्‍नामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे एसपीएससीद्वारे त्यांच्या कारभारात सुसूत्रता आणण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

एमपीससीची संवाद व्यवस्था फारच कमकुवत आहे. कुठल्याही ई-मेल वा फोन कॉलला प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्‍न सोडविण्यासाठी वारंवार मुंबईला जावे लागते. त्यामुळे प्रत्येक विभागात उपकार्यालये व्हावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुलभता होईल. अडचणी सोडविण्यास सोपे होईल.

उमेश कोर्राम,

स्टुडण्ट राइट्स असोसिएशन ऑफ इंडिया.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com