Bacchu Kadu : रवी राणांबद्दल विचारताच बच्चू कडू म्हणाले, ‘ते स्वतःच तेवढं वात्रट आहे...’

आमदार रवी राणांना (MLA Ravi Rana) मी १ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्या दिवशीपर्यंत त्यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे सादर केले पाहिजे, असे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) म्हणाले.
MLA Bacchu Kadu and MLA Ravi Rana
MLA Bacchu Kadu and MLA Ravi RanaSarkarnama

नागपूर : हा दोघांपुरता संघर्ष नाही. तर आमदार रवी राणांनी जे आरोप केले, ते ५० आमदारांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहेत. कारण आम्ही पैसे घेतले तर मग दिले कुणी, हा मोठा प्रश्‍न आहे. तेव्हा या दोन्ही नेत्यांनी ते स्पष्ट केले पाहिजे. हा वाद आता बच्चू कडूपुरता मर्यादित राहिलेला नाही, असे माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू आज नागपुरात (Nagpur) ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो, तेव्हा पैसे घेऊनच गेलो आणि तेवढाच आमचा उद्देश होता का, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. राजकारणात (Politics) बऱ्याच गोष्टी होत असतात. अगदी शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळापासून त्या चालत आल्या आहेत. पण पैसे घेतले, असा थेट आरोप करायचा, याला काय अर्थ आहे? असे आरोप आम्ही सहन करणे कुणालाही अपेक्षित नाहीये. आमदार रवी राणांना (MLA Ravi Rana) मी १ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्या दिवशीपर्यंत त्यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे सादर केले पाहिजे, असे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) म्हणाले.

MLA Bacchu Kadu and MLA Ravi Rana
Bacchu Kadu : बच्चू कडू अन् राणांमधील धुसफूस शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर मिटणार का?

एकनाथ शिंदे यांनी पैसे दिले की देवेंद्र फडणवीसांनी दिले, हे त्यांनी आता स्पष्ट केले पाहिजे. पुरावा म्हणून एखादी रेकॉर्डिंग आहे का, तीसुद्धा सादर केली पाहिजे. जर या नेत्यांनी नाही दिले, तर मग नरेंद्र मोदींनी दिले की अमित शहांनी दिले का, याचे पुरावे त्यांनी दिले पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडुंनी सभागृहात तडाखेबंद भाषण केले होते. त्यामध्ये त्यांनी सर्वच नेत्यांवर ताशेरे ओढले होते, त्याचा फटका तर आता बसत नाही, असे विचारले असता, त्याचा फटका पडत असेल तरी मला त्याचा काही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.

माझ्यासाठी माझा अपंग बांधव, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर हा विषय महत्वाचा आहे. जेव्हा यांच्यावर काही येईल, तेव्हा बच्चू आरपार करून विषयच मोकळा करून टाकेन, असे आमदार कडू म्हणाले. आमदार रवी राणांना कुणीतरी फुस लावली आहे. त्यामुळेच ते बच्चू कडूंवर आरोप करत सुटले आहेत, अशी एक चर्चा आहे, याबद्दल विचारले असता, कुणी फुस लावली, असे वाटत नाही. कारण ‘ते स्वतःच तेवढं वात्रट आहे’, असे उत्तर आमदार बच्चू कडू यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com