केंद्राच्या सूचनांकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष, त्यामुळेच घडतात भंडारा, नगरसारख्या घटना…

एका पाठोपाठ एक घटना घडुनही राज्य सरकार State Government गंभीर होत नाही. या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी डॉ. भारती पवार Dr. Bharti Pawar यांनी केली.
Dr. Bharti Pawar and MP Sunil Mendhe
Dr. Bharti Pawar and MP Sunil Mendhe Sarkarnama

भंडारा : राज्यांतील रुग्णालयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून राज्यांना वारंवार सूचना केल्या जातात. पण महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच भंडारा आणि नगरसारख्या घटना वारंवार होतात, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या.

भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांच्याकडून आयोजित दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होत्या. फायर ऑडिट करू, फायर सेफ्टी मेजर करू, असे राज्य सरकारने भंडारा येथील घटना घडल्यानंतरही सांगितले होते. पण प्रत्यक्षात तसे काही केले नाही. त्यामुळे त्या घटनेची पुनरावृत्ती नगर येथे झाली. राज्य सरकारने जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर एका पाठोपाठ एक अशा घटना घडत जातील आणि निर्दोष नागरिकांचे जीव जात राहतील, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

राज्यात रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडत असून वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारद्वारा सातत्याने राज्याला सूचना देण्यात येतात. या बाबतीत सतर्क राहा, काळजी घ्या, असे आवाहन केले जाते. फायर ऑडिट, फायर सेफ्टी मेजर करण्याच्या सूचना केंद्र सरकार द्वारे दिल्या गेल्या. पण राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. आत्ताची घटना घडल्यानंतरही राज्य सरकारने सांगितले की, फायर ऑडिट, फायर सेफ्टी मेजर करू. पण यावेळी सरकार ते करेल की नाही, याची शाश्‍वती नाही, अशी शंका डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. सरकारने ‘हो करू...’ असा केवळ शब्द दिल्याची खंत व्यक्त करीत या हॉस्पिटल जळीतप्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

Dr. Bharti Pawar and MP Sunil Mendhe
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी गोंदीयाचा दौरा सोडून रात्रीच थेट नगरचे रुग्णालय गाठले!

दुर्दैवी घटना..

नगरची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोविडचे १७ रुग्ण आयसीयुमध्ये भरती होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या दुर्घटनेत ११ रुग्णांचे जी गेले आणि वाचलेले ६ रुग्ण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेथे तात्काळ भेट दिली, रुग्णांच्या नातेवाईकांशीही चर्चा केली, त्यांना दिलासा दिला. खरं तर ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण एका पाठोपाठ एक घटना घडुनही राज्य सरकार गंभीर होत नाही. या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी डॉ. भारती पवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com