कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या केवळ भीतीने शाळा बंद ठेवणे अयोग्य...

राजकारणी लोक भेटीगाठी घेतात. हे फक्त दिसण्यासाठी असते. पण या भेटी कशासाठी आहेत, हे राजकारणी लोक (Political Leaders) कुणालाही पत्ता लागू देत नाहीत.
Bacchu Kadu, Minister of State
Bacchu Kadu, Minister of StateSarkarnama

नागपूर : सद्यःस्थितीत कोरोनाची (Corona) भिती हळूहळू का होईना कमी झालेली आहे. नवीन व्हेरीअंट येणार असल्याची थोडीफार भिती लोकांच्या मनात आहे. घरी बसून लोकांना दोन वर्ष झालेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते विद्यार्थ्यांचे (Students) हे नुकसान होताना आपण बघत आहोत. आज शाळा सुरू झाली आणि तिसरी लाट येण्याची शक्यता जरी दिसली तर पुन्हा शाळा बंद करता येतील. पण केवळ तिसरी लाट येण्याच्या भीतीने आज शाळा बंद ठेवणे योग्य वाटत नाही, असे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.

बच्चू कडू म्हणाले, तिसऱ्या लाटेची चुणूक जरी लागली, तरी आपल्याला केव्हाही शाळा बंद करता येतील. पण आता शाळा सुरू करणे आणि जोपर्यंत गंभीर परिस्थितीचा इशारा होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू ठेवणे गरजेचे आहे आणि हा प्रयत्न सरकार करीत आहे. तरीही स्थानिक प्रशासनाने परिस्थिती बघून निर्णय घ्यावा, असे आपण जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सूचित केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये काही शंका आहे, तेथे शाळा सुरू नाही होणार. पण ज्या जिल्ह्यांमध्ये काहीच धोका नाही, तेथे मात्र शाळा सुरू राहतील.

राजकारणी लोक पत्ता लागून देत नाहीत..

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. काल त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. यामुळे देशात नवीन राजकीय समीकरणे तयार होताहेत का, या प्रश्‍नावर बच्चू कडू म्हणाले की, राजकारणी लोक भेटीगाठी घेतात. हे फक्त दिसण्यासाठी असते. पण या भेटी कशासाठी आहेत, हे राजकारणी लोक कुणालाही पत्ता लागू देत नाहीत. त्यामुळे अशा भेटीगाठींवर विश्‍वास ठेवू नका.

Bacchu Kadu, Minister of State
बच्चू कडू संतापले, `अरे, तुम्ही तर मंत्री जयंत पाटील यांच्या पत्रालाही दाद देत नाही`

उलटं काही व्हायला नको..

ममता बॅनर्जींनी महाराष्ट्रात येऊन काही नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटी देशात नवीन समीकरणांची नादी ठरू शकते. तसे झाले तर चांगलेच आहे. पण उलटं काही व्हायला नको. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा अतिसामान्य लोकांवर फारसा परिणाम होत नाही. कोरोनाचा विचार केल्यास त्याचा प्रभाव केंद्र सरकारवर, राज्य सरकारवर आणि जगावर पडलेला आहे. राज्याची स्थिती कोरोनाच्या काळात कमकुवत झाली आहे. अनेक रस्त्यांची कामे केवळ सुरू होऊन बंद पडलेली आहे. संजय गांधी निराधारचे पगारही गेल्या चार महिन्यांपासून थकीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com