ते बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवत आहेत, तर त्यांच्या कुटुंबीयांना मारणार का?

एकतरी असे भाषण दाखवून द्यावे की, ज्यामध्ये त्यांनी कॉंग्रेससोबत जाण्याचा उल्लेख केलेला आहे, असे आव्हानदेखील खासदार राणा (MP Navnit Rana) यांनी ठाकरेंना दिले.
MP Navnit Rana
MP Navnit RanaSarkarnama

नागपूर : बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा घेऊन चालणारे जे शिवसैनिक आहेत, त्यांच्या घरांवर, कार्यालयांवर उद्धव ठाकरे यांच्याकडून गुंड पाठवून तोडफोड केली जात आहे. घरी महिला, लहान मुले, वयोवृद्ध असतात. त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला.

बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील त्यांच्या एकाही भाषणात कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याचा उल्लेख नाही. उलट बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) असे म्हटले होते की, कॉंग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याची वेळ कधी आलीच, तर त्या दीवशी मी माझी शिवसेना बंद करेन. पण कॉंग्रेससोबत जाणार नाही. त्यांचे प्रत्येक भाषण याच लाइनवर होते. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे एकतरी असे भाषण दाखवून द्यावे की, ज्यामध्ये त्यांनी कॉंग्रेससोबत जाण्याचा उल्लेख केलेला आहे, असे आव्हानदेखील खासदार राणा (MP Navnit Rana) यांनी ठाकरेंना दिले.

गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावर अन्याय केला. आम्ही काय करत होतो, तर हनुमान चालिसा वाचत होतो. पण आम्हाला उचलून जेलमध्ये टाकण्यात आले. आमच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि आज आमदारांना त्यांच्या परिवारांना खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार महाराष्ट्रात सुरक्षित नव्हते, म्हणूनच तर इतर राज्यात जाऊन बसलेले आहेत. आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न मोठा आहे. त्यामुळे आता त्यांची जबाबदारी कुणातरी घ्यायला हवी.

खऱ्या शिवसेनेमध्ये गेलेले म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आणि त्यांच्या परिवारांना आता सुरक्षा देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, त्यांनी आमदारांच्या परिवारांना केंद्राची यंत्रणा वारपून सुरक्षा पुरवावी आणि महाराष्ट्रात लवकरात लवकर राष्‍ट्रपती शासन लागू करावे. जेणेकरून सध्या सुरू असलेल्या गुंडगिरीला आळा घालता येईल. आता उद्धव ठाकरे यांची गुंडगीरी बंद झाली पाहिजे आणि महाराष्ट्राची जनता सुरक्षित राहिली पाहिजे, असे खासदार राणा म्हणाल्या.

MP Navnit Rana
Video: अमरावतीचा पाणी पुरवठाचा प्रस्ताव राज्य सरकार त्वरित मंजूर करावा;नवनीत राणा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज जे वक्तव्य केले. ज्यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंसोबत कामे केले, ते एकनाथ शिंदे याच्यासारखे नेते खरे शिवसैनिक आहेत आणि त्यांच्यासोबत जे गेले ते बाळासाहेबांची विचारधारा घेऊन चालणारे खरे हिंदुत्ववादी आहेत. त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदुत्वासाठी काम करून लोकांचे प्रतिनिधीत्व केले. आज बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले पाहिजे, म्हणून शिवसेनतील एक मोठा गट वेगळा झाला आहे. कारण गेल्या अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे गुंडगिरीची भाषा बोलायला लागले आहेत.

उद्धव ठाकरेंचीच भाषा आज त्यांचे प्रवक्ते शिवसेना नेते खासदार संजय राऊत बोलले. ते म्हणाले की, आमदारांना सुरक्षा आहे, पण त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा नाही. याचा अर्थ जे आमदार तुम्हाला सोडून गेले, त्यांच्या परिवारजनांना तुम्ही मारणार आहात काय, असा सवाल खासदार राणा यांनी केला. ही तर सरळसरळ धमकी आहे, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com