यापुढे आमच्या वाट्याला गेलात तर...; कडूंचा राणांना थेट इशारा

Bacchu Kadu आज जिल्हाध्यक्षांची बैठक झाल्यानंतर सर्वांच्या सह्या घेऊन एक दिव्यांग बांधव माझी भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते
 Bacchu Kadu
Bacchu Kadu

Bacchu Kadu news अमरावती : जली को आग को कहते हे, बुझी को राख कहते, जिस राख से बारुद निकलती हैउसे प्रहार कहते है, प्रहार आंडू-पांडू पक्ष नाही. आम्ही दिसताना कमी दिसत असलो तरी आमच्यातील प्रत्येकजण बाजीप्रभु आहे, तानाजी मालुसरे आहे, आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही, गेला तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विना कारण तोंड माराल तर तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही. सत्ता गेली चुलीत, त्याची आम्हाला पर्वा नाही. आमच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे, कोणीही यावं आणि काहीही बोलावं हे मान्य नाही, पहिली वेळ आहे म्हणून माफ केलं. पण यापुढे आमच्या वाट्याला गेलात तर माफ करणार नाही. असा इशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.

अमरावतीचे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या चार-पाच दिवासापासून मोठ्या शाब्दिक चकमकी झडत होत्या. हा वाद शिगेला पोहचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद शांत केला. पण आज जिल्हाध्यक्षांची बैठक झाल्यानंतर सर्वांच्या सह्या घेऊन एक दिव्यांग बांधव माझी भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सरकारमध्ये राहायचं, सरकाला बाहेरुन पाठिंबा द्यायचा किंवा आपण तटस्थ राहायचं, अशा भूमिका त्यांनी मांडल्या आहेत. याबाबत कडू आज त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले होते.

 Bacchu Kadu
बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक; रवी राणांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ

गेले वीस वर्ष आम्ही साडेतीनशे गुन्हे डोक्यावर घेऊन फिरतो. बाकीचे नेते लढ म्हणतात, आणि बच्चू कडू स्वत: लढाई करतो आम्ही बंडखोरी केली नाही, आम्ही उठाव केला. आम्ही छोटे असलो तरी दिलदार आहोत. जे बंडखोर आहेत ते पहिल्या पंक्तीत आहेत. आमचा कार्यक्रम हा शक्ती प्रदर्शन नाही. आम्ही सैनिकासारखं जगतो. फार विचार करत नाही. गर्दीमध्ये दर्दी मह्त्त्वाची आहे. गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रातला एकही कोपरा सोडला नाही. आजचा कार्यक्रम हा शक्ती प्रदर्शन नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणी मराठा आरक्षणासाठी लढत होता, कोणी मुस्लिम तर कोणी धनगर आरक्षणासाठी लढत होता. पण बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढत होता. आम्ही राजकारणासाठी कधीही दिव्यांगाचा वापर केला नाही. जातीपातीच्या आणि पैशाच्या ताकदीवर निवडण येणारे आमदार कमी नाहीत. पण आज जी काही प्रहार उभी आहे, ती सेवा आणि सेवेच्या माध्यामातून उभी आहे. पण जर कोणी या सेवेला हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन करण्याची हिंमत आमच्यात नाही. असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com