Nana Patole : पालकमंत्री जाहीर करताना ते ‘स्पायडर मॅन’ असल्यासारखे वाटले !

महाराष्ट्राचा कारभार गुजरातच्या इशाऱ्यावर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
Nana Patole at Akola
Nana Patole at AkolaSarkarnama

अकोला : राज्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे. पिकांचे नुकसान होऊनही त्यांना मदत नाही. येथील रस्त्यांचा विकास ठप्प आहे. राज्यातील मालमत्ता गुजरातमध्ये नेली जात आहे. महाराष्ट्राला अधोगतीला नेण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राचा कारभार गुजरातच्या इशाऱ्यावर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

अकोला (Akola) जिल्ह्यात ‘भारत जोडो’ यात्रेच्या तयारीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत भाजप व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. दिल्ली दरबारातील हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगून महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे. राज्यातील मालमत्ता गुजरातला नेण्याचे मनसुबे आखले जात आहेत. जिल्ह्यांचे पालकमंत्री (Guardian Minister) जाहीर करताना ते ‘स्पायडर मॅन’ असल्यासारखे वाटले आहे. कसा विकास होणार, असा प्रश्‍न पटोलेंनी (Nana Patole) केला.

अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सहा वर्षांपासून रखडली आहेत. अकोटला जाताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता हे समजले नाही. हीच परिस्थिती राज्यभरातील आहे. येथील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. सर्व कारभार गुजरातच्या इशाऱ्यावर चालविला जात असल्याने येथील विकास ठप्प झाला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. पत्रकार परिषदेला काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी, मदन भरगड, साजिद खान पठाण, डॉ. झिशान हुसेन, कपिल ढोके, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भारत जोडो यात्रेचा भाजपने धसका घेतला..

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा भाजपने धसका घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याची चुकीची माहिती पेरली जात आहे. ही भाजपची अस्वस्थता असून, काँग्रेस एकसंघ असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole at Akola
Congres| महापालिका निवडणूका स्वबळावरच लढणार; नाना पटोले

न्यायव्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण होतोय..

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेले निर्णय व आता घेतलेले निर्णय हे न्याय व्यवस्थेवर संभ्रम निर्माण करणारे असून, हे लोकशाहीसाठी सर्वाधिक घातक असल्याचे नाना पटोले म्हणाले.

आंबेडकरांचा प्रस्ताव नाही..

राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर योग्य ती पावले उचलली जातील, असे नाना पटोले यांनी सांगितले. विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघ हा काँग्रेसच्या कोट्यात असून, उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, असे नाना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com