परकीयांनी हल्ले केले, आता हिंदूंच्या भावनांसाठी नावं बदलली तर काय झालं?

त्यावेळी हिंदूच्या (Hindu) भावना दुखावल्या. आता हिंदूंच्या भावनांसाठी गावांची नावं बदली तर काय झालं, असे केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आज येथे म्हणाले.
Raosaheb Danve and Chandrashekhar Bawankule Hindu

Raosaheb Danve and Chandrashekhar Bawankule Hindu

Sarkarnama

नागपूर : या देशावर परकीयांनी आक्रमणे केली. त्यावेळी हिंदूच्या (Hindu) भावना दुखावल्या. आता हिंदूंच्या भावनांसाठी गावांची नावं बदली तर काय झालं, असे केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आज येथे म्हणाले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, हीसुद्धा आमचीच मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

हैदराबादचे नाव भाग्यनगर केले जाणार आहे, याबाबत प्रश्‍न विचारला असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. येथील संघ मुख्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी कोराडी येथे जगदंबा मंदिरात दर्शन घेऊन आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्याबद्दल त्यांनी आमदार बावनकुळेंचे अभिनंदन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाही, यात काही नवीन घडतंय असं अजिबात नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? राज्यात किती दौरे केले? राज्यावरील संकटात ते कधीही बाहेर पडले नाहीत.

मुख्यमंत्री आजारी आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो की, मुख्यमंत्री लवकर बरे व्हावे, आणि जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, असे सांगताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. कुठल्याही कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असत नाही. तीन पक्षांचं सरकार मिळून निर्णय करीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काही फरक पडणार नाही. हे सरकार पाडण्यात भाजपला अजिबात रस नाही. कारण हे सरकार एकमेकांच्या पायांत पाय अडकूनच पडणार आहे, असे ते म्हणाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान रोजच सभागृहात आलेले आहेत. आमचं सरकार सर्व विषयावर चर्चा करायला तयार आहे. पण विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत नुसता गोंधळच घातला. आधारकार्ड लिंक, मतदार नोंदणी या बिलाला विरोधकांचा विरोध आहे. आठ वर्षांत केंद्र सरकारने कृषी, रेल्वे, उद्योग क्षेत्रासह अनेक विषयात चांगलं काम काम केलं. पण राज्य सरकार काहीच काहीच काम करू शकले नाही, असा आरोप दानवे यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Raosaheb Danve and Chandrashekhar Bawankule Hindu</p></div>
राजकारणात अनेकांना चकवा देणारे रावसाहेब दानवे पाक कलेतही तरबेज

त्यांनी चांगलं काम केलं तर आम्ही चांगलं काम केलं, असंच म्हणू नाहीतर टीका करू. पेपरफुटी हा प्रकार म्हणजे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. हा फार मोठा भ्रष्टाचार आहे. याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आमच्या काळात नेमलेल्या संस्था असत्या आणि आमच्या काळात असं झालं असतं तरीही घोटाळा दबला नसला असे सांगत आता घोटाळा कोणी केला याची सखोल चौकशी करावी, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. सेना युपीएत सहभागी होत आहे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यात काही सांगू शकत नाही. रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही. भाग्यनगरी रेल्वे सुरू करण्याबाबत विचार करणार असल्याचे ते म्हणाले.

कोराडी दर्शन..

रावसाहेब दानवे यांनी आज कोराडी येथील जगदंबा देवी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली. सौ.ज्योती बावनकुळे याप्रसंगी उपस्थित होत्या. कोराडी देवी मंदिरात दर्शनानंतर दानवे यांनी तेथील विकास कामांची विचारपूस केली. आमदार बावनकुळे यांनी मंदिराच्या विकासाबद्दलची सर्व माहिती त्यांना सांगितली. जगदंबा देवी मंदिराचा चेहरामोहराच बदलून गेला असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. याप्रसंगी मंदिरातील अन्य विश्वस्त भाविकांचीही दानवे यांनी विचारपूस केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com