उद्धव ठाकरेंच्या मागे साडेसाती लागली, मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी, नाही तर मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार, असा इशारा आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता.
MLA Ravi Rana
MLA Ravi RanaSarkarnama

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढल्यापासून महाराष्ट्रातील (Maharashtra) वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच अमरावतीचे राणा दाम्पत्य आणि महाविकास आघाडीचा विरोध सर्वश्रुत आहे. आता आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याचा इशारा पुन्हा दिला आहे. त्यामुळे वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी, नाही तर मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार, असा इशारा आमदार रवी राणा यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता. आज त्याचा पुनरुच्चार करीत राणांनी पुन्हा तोच इशारा दिला आहे. आधीच राजापेठच्या पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा उभारल्यावरून जे रान पेटले, ते अद्याप विझले नाही. परवा परवा आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर आज आमदार राणांनी (MLA Ravi Rana) मातोश्रीवर जाण्याचा इशारा पुन्हा दिला आहे.

आमदार राणा म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागे साडेसाती लागली आहे. त्यामुळे राज्यावर तसेच मातोश्रीवरही संकट आले आहे. ते संकट दूर करण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा होणे गरजेचे आहे. त्यामुळे मी आता लवकरच मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार आहे. हे सर्व मी मुख्यमंत्र्यांच्या भल्यासाठीच करतो आहे. त्यामुळे हे करण्यासाठी ते माझ्यावर कुठलाही दबाव आणणार नाहीत आणि मातोश्रीवर जाण्यासाठी बंधने लादणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. आमदार राणांच्या या भूमिकेमुळे राज्यातील वातावरण पुन्हा तापणार, हे मात्र निश्‍चित.

MLA Ravi Rana
Video: लोकांसाठी तुरुंगात टाकलं, तरी जायला तयार; रवी राणा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि सर्वांच्या हृदयात असलेला मातोश्री बंगला बाळासाहेबांच्या नावाने ओळखला जातो. त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहतात. उद्धव ठाकरे जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून राज्याला साडेसाती लागली आहे. राज्यावर वारंवार मोठमोठे संकटं येत आहेत. तरीही ते दोन वर्षांपासून मंत्रालयात गेले नव्हते, शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. बेरोजगारी वाढली, राज्य लोडशेडींगच्या संकटात आहे, विकासाचं कोणतही महत्वाचं काम राज्यात होत सुरू नाहीये. ही संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचावी, अशी विनंती केली होती. परंतु ती त्यांनी धुडकावली. त्यामुळे मीच आता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार आहे, असे आमदार राणा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com