Fadanvis : तुपकरांनी घेतली फडणवीसांची भेट, लाठीचार्जच्या चौकशीची केली मागणी !

Buldhana : पीकविमा व अतिवृष्टीच्या मदतीसाठी तुपकर आंदोलने करीत आहेत.
Ravikant Tupkar with Devendra Fadanvis
Ravikant Tupkar with Devendra FadanvisSarkarnama

Ravikant Tupkar News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर भेट घेतली. या भेटीत तुपकरांनी ११ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची वस्तुस्थिती फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तुपकरांनी केली आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा व अतिवृष्टीच्या मदतीसाठी रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने करीत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला होता.

आंदोलनादरम्यान तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविकांत तुपकर व सहकाऱ्यांना ६ दिवस कारागृहात रहावे लागले होते. कारागृहातून सुटल्यावर पत्रकार परिषदेत पोलिसांनी केलेला लाठीमार हा पूर्व नियोजित कट असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुढील आंदोलन हे आरपारचा लढा असेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी अकोला येथील कारागृहातून बाहेर निघताच दिला होता. बुलढाणा येथे आत्मदहन आंदोलनानंतर पोलिसांनी तुपकर व त्यांच्या २५ साथीदारांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. यादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला व विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने तुपकर व त्यांच्या २५ साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

Ravikant Tupkar with Devendra Fadanvis
Ravikant Tupkar:''मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय,त्यांनी...''; तुरुंगातून बाहेर येताच तुपकरांचा शिंदेंवर घणाघात

शेतकऱ्यांच्या (Farmers) कापूस व सोयाबीनला भाव मिळत नसल्याने रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी ते चार दिवसांपासून गायब होते. गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी १० तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा ११ फेब्रुवारीला बुलढाणा (Buldhana) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com