Fadanvis : दोन-अडीच महिन्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असावा !

Kasba : निवडणुकीत पैसे वाटणे, ही आमची संस्कृती नाही.
Uddhav Thackery, Aditya Thackery and Devendr Fadanvis.
Uddhav Thackery, Aditya Thackery and Devendr Fadanvis.Sarkarnama

Thackeray and Devendra Fadanvis News : जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र, हे आरोप भाजपवर नाही आहे. तर हे आरोप मतदारांवर आहेत. मतदार पैसे घेऊन मतदान करतात, हा त्यांचा अपमान आहे. मतदारांचा असं अपमान करण्याचा कुठलाही अधिकार काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरात आले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत पैसे वाटणे, ही आमची संस्कृती नाही. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, काहीही होईल. मात्र पैसे वाटणार नाही. मतदारच आम्हाला वारंवार जिंकून देतात. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत. हे विरोधकांना माहीत पडल्यानंतर त्यांचा असा रडीचा डाव सुरू झालेला आहे. कसब्यामध्ये आचारसंहितेचा खुलं उल्लंघन करण्यात आला आहे.

गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, त्याबद्दल विचारले असता, त्यासंदर्भात जे सांगायचंय ते मीच सांगितलं आहे. मात्र अशा गोष्टींवर रोज चर्चा करायची नसते. त्याची योग्य वेळ असते. योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी सांगेन, हे सांगताना त्यांनी अजित पवारांवरही टिका केली. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं, त्यांच्या लोकांना संदेश देण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं, असं फडणवीस म्हणाले.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव झाल्यानंतर हा निर्णय आमच्या काळातील असल्याचे विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत विचारले असता, काही लोकांना असं वाटतं की सर्व काही त्यांच्याच काळातलं आहे. त्यांचा काळ अडीच वर्षाचा होता. अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष ते दाराच्या आतच होते. त्यामुळे नंतर त्यांना जे काही दोन अडीच महिने मिळाले, त्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल, असे त्यांना वाटते.

Uddhav Thackery, Aditya Thackery and Devendr Fadanvis.
Fadanvis : तुपकरांनी घेतली फडणवीसांची भेट, लाठीचार्जच्या चौकशीची केली मागणी !

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील आमच्या सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबादला, तर धाराशीव हे नाव उस्मानाबादला दिलं आणि प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले. ते केंद्राने मान्य केले. हे वास्तव आहे. उद्या कदाचित आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) असेही म्हणू शकतात की त्यांच्या सांगण्यामुळेच मोदींनी हे प्रस्ताव मान्य केले, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com