Pune Bypoll Election : पैसे वाटणं भाजपची संस्कृती नाही, महाविकास आघाडीचा रडीचा डाव; फडणवीसांचा पलटवार

MVA : अडीच महिन्यात अख्खा महाराष्ट्र बदलल्याचे त्यांना वाटत असेल, ठाकरेंनाही टोले
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis : अडीच वर्षांतील त्यांनी अडीच महिने काम केले. त्या अडीच महिन्यात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बदलला असेल, तर ते मला माहिती नाही. तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासाठी मोदींना आम्हीच फोन केला असेही ते कदाचित म्हणतील, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

नागपूर (Nagpur) येथे प्रसारमाध्यमांशी फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांना पोटनिवडणुकीत भाजपच्यावतीने पैसे वाटप होत असल्याबाबत विचारण्यात आले. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "भाजपची (BJP) पैसे वाटण्याची संस्कृती नाही. आम्ही हारू किंवा जिंकू पैसे वाटत नाही. त्यामुळेच जनता वारंवार आम्हाला जिंकून देत आहे. आताही आम्ही जिंकणार आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने (MVA) रडीचा डाव सुरू केला आहे.

Devendra Fadnavis
Ramdas Athwale: नाव बदलून शहराचा विकास होत नाही; रामदास आठवलेंना नक्की म्हणायचं काय?

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) आणि उस्मानाबादचे धाराशिव (Osmanabad) असे नामांतर करण्यात आले आहे. हे काम महाविकास आघाडीने केल्याचा दावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. याबाबत फडणवीस यांनी ठाकरे यांना नाव न घेता टोले लागवले आहेत.

फडणवीस म्हणाले, "काही लोकांना वाटत की सगळी कामे त्यांच्या काळातच झाली. त्यांचा काळ अडीच वर्षांचा. त्यातील सव्वादोन वर्षांचा काळ घराच्या दाराआड गेला. उरलेल्या अडीच महिन्यांत त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेन, तर मला माहिती नाही."

Devendra Fadnavis
Satara : पैसा खाल्ला असता तर प्रोजेक्ट झाले असते का : उदयनराजेंचे प्रतिउत्तर

पुढे फडणवीस यांनी हा निर्णय आम्हीच घेतल्याचा दावा केला. ते म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने नामांतराचा मंत्रिमंडळात निर्णय घेतला. त्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो प्रस्ताव मान्य केला."

यानंतर पुन्हा फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लागावला. ते म्हणाले, "नमांतराचा प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली. यावर ते कदाचीत म्हणतीलही की त्यांनीच मोदींना फोन केला म्हणून हा प्रस्ताव मान्य झाला."

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मध्यावधी निवडणुका लागतील यावर फडणवीसांनी जास्त बोलणे टाळले. ते म्हणाले, "आपल्या लोकांना दिलासा देण्यासाठी तसे बोलावे लागते."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com