कॉंग्रेसचे डावपेच : बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे सर्वात उशिरा मतदान…

कॉंग्रेसने (Congress) पहिल्या टप्प्यात आपल्या ४२ आमदारांचे मतदान करवून घेतले आणि बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण या दोन नेत्यांचे मतदान सर्वात शेवटी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Balasaheb Thorat News, Rajyasabha Election 2022 News Updates in Marathi
Balasaheb Thorat News, Rajyasabha Election 2022 News Updates in MarathiSarkarnama

नागपूर : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज मुंबई येथील विधानभवनात दुपारी १ वाजेपर्यंत २६० आमदारांनी मतदान केले आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारास ४४ पैकी ४२ मते देण्यात आली आहेत. कॉंग्रेसने अनोखे डावपेच आखले आहेत. अद्याप राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदान सर्वात उशिरा करण्यात येत आहे. (Rajyasabha Election 2022 News Updates in Marathi)

राज्यसभा (Rajyasabha) निवडणुकीसाठीचे मतदान अतिशय चुरशीने आणि बुद्धिमत्ता लावून करावे लागले. कॉंग्रेसने (Congress) पहिल्या टप्प्यात आपल्या ४२ आमदारांचे मतदान करवून घेतले आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या दोन नेत्यांचे मतदान सर्वात शेवटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या उमेदवारास ४४ पैकी ४२ मते देण्यात आली असून त्यांच्याकडील २ अतिरिक्त मते मिळून एमआयएमचे २ अशी एकूण चार मते शिल्लक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४७ आमदारांनी मतदान केले असून त्यांच्याकडे चार अतिरिक्त मते आहेत. आत्तापर्यंत शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केले आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याकडील अतिरिक्त मतांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. (Balasaheb Thorat News)

कोणत्या उमेदवारास कितवा पसंतीक्रम द्यायचा यावर सध्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यात चर्चा सुरु आहे. विधान भवनामधील शिवसेना पक्ष कार्यालयात ही बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यसभा मतदानाची पडताळणी आणि २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Balasaheb Thorat News, Rajyasabha Election 2022 News Updates in Marathi
राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांसाठी महाडिकांनी अशी लावलीय फिल्डिंग!

शिवसेना आमदार आणि सोबतच्या अपक्ष आमदारांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबई येथील विधानभवनात येथे दुपारी 1.00 वाजेपर्यंत 260 आमदारांनी मतदान केले आहे. मतदान सुरु असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाला जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला 2 आमदारांच्या मतांचा फटका बसला आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आव्हाडांप्रमाणे नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. या दोन्ही मुद्द्य़ांवर भाजपने हरकत घेतली आहे. ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com