अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ काटोल तालुक्यातील १८ गावांत रास्ता रोको…

तक्रारकर्ता परमबीर सिंह Parambir Singh म्हणतो, माझ्याकडे पुरावे नाहीत आणि केंद्रीय तपास यंत्रणा मात्र देशमुख कुटुंबाच्या Anil Deshmukh Family मागे लागली आहे.
Agitation in Katol for Anil Deshmukh.
Agitation in Katol for Anil Deshmukh.Sarkarnama

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यांचे चिरंजीव हृषीकेश यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांच्या आरोप करणारे परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत आणि कळवतात की, माझ्याकडे यापेक्षा जास्त पुरावे नाहीत. तरीही ईडीचे अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या विरोधात दिवसाआड काही ना काही कारवाया करीत आहेत. याचा निषेध म्हणून अनिल देशमुख यांच्या काटोल या मतदारसंघातील १८ गावांत लोकांना रास्ता रोको करून देशमुखांना समर्थन दिले.

एकीकडे परमबीर सिंह हे राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर म्हणतात, की माझ्याकडे पत्रा शिवाय कोणतेही पुरावे नाहीत आणि दुसरीकडे मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ईडी सांगते की अनिल देशमुख हे संशयित आहेत, म्हणून त्यांची चौकशी करायची आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अनिल देशमुख ईडी समोर चौकशीसाठी जातात. चौकशी अपूर्ण असतानाही त्यांना मध्यरात्री अटक करण्यात येते. तक्रारकर्ता म्हणतो माझ्याकडे पुरावे नाहीत आणि केंद्रीय तपास यंत्रणा मात्र देशमुख कुटुंबाच्या मागे लागली आहे.

या संस्थांवर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा दबाव आहे, हे यावरून स्पष्ट होते. देशमुख कुटुंबीयांची चौकशी करीत असताना त्यांच्या घरावर धाड टाकतात. तक्रारकर्ते परमबीर सिंह यांची मात्र अजूनही चौकशी करण्यात आली नाही. केंद्रातील भाजप सरकार हे परमबीर सिंह यांना हाताशी धरून देशमुख कुटुंबीयांविरुद्ध विरुद्ध कटकारस्थान रचत आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. खोट्या आरोपांत अनिल देशमुख यांना केंद्रीय संस्था फसवत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याने काटोल विधानसभा क्षेत्रात आज जवळपास १८ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. काटोल-नरखेड मतदार संघाच्या प्रत्येक गावातील नागरिक आपापल्या पद्धतीने आंदोलन करून अनिल देशमुख यांच्या अटकेचा निषेध करीत आहे.

Agitation in Katol for Anil Deshmukh.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी समोर कधी जाणार?, देशमुख म्हणतात...

केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजप सोडून इतर पक्षांतील नेत्यांवर कारवाया करीत आहे, त्यावरून यंत्रणा भाजपच्या दबावाखाली आहे, असे जनतेत बोलले जात आहे. भाजप नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवरच ईडीचे हत्यार उपसले जात आहे. केंद्र सरकारचे हे राजकारण आमच्या लक्षात येत आहे. पोटनिवडणुकीत जनतेने प्रचंड महागाईचे उत्तर भाजपला दिलेच आहे. यापुढेही असेच सुरू राहिले, तर आगामी निवडणुकीतही भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा काटोलमधील आंदोलक जनतेने आज दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com