आमदार आशिष जयस्वालांना भाजपकडून फटाके लावणे सुरू ; त्यांचं मंत्रिपद दूर जातंय ?

आमदार आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी मातीमिश्रित वाळूच्या व्यवहारात १५० कोटींचा घोटाळा केला आहे.
MLA Ashish Jaiswal and Dr. Rajesh Thakre
MLA Ashish Jaiswal and Dr. Rajesh ThakreSarkarnama

नागपूर : महाराष्ट्रातील सत्तांतराच्या महानाट्यात एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल हे मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी धडपडत आहेत. पण त्यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. मागील काळात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर ३०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता, तर आता भाजपच्या (BJP) ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी त्यांच्यावर मातीमिश्रित वाळूच्या व्यवहारात घोटाळ्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होऊन सत्तेत सहभागी झालेल्या आमदार जयस्वालांना (MLA Ashish Jaiswal) भाजपमधून फटाके लावण्याचे काम सुरू झाले आहे. आमदार जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी मातीमिश्रित वाळूच्या व्यवहारात १५० कोटींचा घोटाळा केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी डॉ. ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, (Amit Shaha) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आमदार जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आ. जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे.

आमदार जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे. खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल १५० कोटींचा गैरव्यवहार जयस्वाल यांनी केला आहे. खनिज विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेचा दुरुपयोग केला आहे. खिंडसी ते वैनगंगा वाहत असलेल्या सूर नदीतील रेती उपसता यावी, यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरांसाठी मातीमिश्रित वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली होती. यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालवर ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यावरून चौकशीस सुरुवात झाली होती, परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती चौकशी बंद केल्याचा आरोपही यावेळी डॉ. ठाकरे यांनी केला.

MLA Ashish Jaiswal and Dr. Rajesh Thakre
भाजप-शिंदे गटामध्ये वादाची पहिली ठिणगी; केसरकर फडणवीसांकडे करणार तक्रार

मॅक्सवर्थ कंपनीशी साटेलोटे करून जयस्वाल यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या नावावर कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकल्या आहेत. ५० पेक्षा जास्त कंपन्या आमदार जयस्वाल यांनी नातेवाइकांच्या नावावर स्थापन केल्या आहेत. लोहकरे हत्याकांड आणि साठवणे हत्याकांडाचेही धागेदोरे त्यांच्यापर्यंत जाऊ पोहोचत असल्याचा आरोप डॉ. ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जयस्वाल यांच्या मर्जीतील लोकांनी धान खरेदी केंद्र उघडून राज्यातील नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांकडून आयात केलेले धान खरेदी केले. त्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार जयस्वाल यांनी केला. एका शेतकऱ्यांचे धानविक्रीचे १४ लाख ५२ हजार रुपये जयस्वाल यांनी हडपले असून अजूनही शेतकऱ्याला पैसे देण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.

ईडी चौकशी करावी..

आमदार आशिष जयस्वाल यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केला आहे. त्यांनी कोट्यवधींची जमीन विकत घेतली आहे. त्यांनी नातेवाइकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांची ईडी चौकशी करण्यात यावी. तसेच सीबीआयनेही आमदार जयस्वाल यांची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. राजेश ठाकरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com