मिटता मिटेना ‘कडू’वटपणा; बच्चू कडू राणांच्या तलवारीचे वार छातीवर झेलायला तयार...

मुंबईत शिंदे-फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली. त्यांच्या भूमिकेचे बच्चू कडूंनी (Bacchu kadu) स्वागतही केले.
Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu and Ravi RanaSarkarnama

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला, असे वरकरणी दिसत जरी होते. पण हा वाद मिटलेला नाही, हे कालच्या घडामोडींवरून लक्षात येते.

मुंबईत शिंदे-फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली. त्यांच्या भूमिकेचे बच्चू कडूंनी (Bacchu kadu) स्वागतही केले. त्यानंतर मुंबईतून (Mumbai) परत आलेल्या बच्चू कडूंनी जाहीर केल्याप्रमाणे १ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये (Amravati) कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर हा एपिसोड आता संपला असे वाटत असतानाचा काल रवी राणा यांनी पुन्हा बच्चू कडूंना चिथावणी दिली. त्यावर बच्चू कडूंनी पुन्हा रवी राणांना आव्हान दिले आहे. शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतरही हा वाद अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे हा वाद पुढे काय वळण घेतो, याकडे राजकीय जाणकारांसह जनसामान्यांचेही लक्ष लागले आहे.

काय म्हणाले रवी राणा..

जो विषय संपलेला आहे, त्यावर मी बोलणार नाही. पण अहंकारापोटी बच्चू कडू हे दाखवत असेल की, रवी राणा बच्चू कडूच्या माफीची गरज आहे. तर बच्चू कडूच्या माफीची गरज रवी राणाला नाही. जे वक्तव्य मी केले होते, त्यापासून माघार मी घेतलेली आहे. पण वारंवार तो सांगत असेल की रवी राणाला मी माफ केलं. तर मी काही मोठा गुन्हा केला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या आदेशाचे मी पालन केले आणि दोन पावलं मागे घेऊन विषय संपविला. पण कुणी जर म्हणत असेल की कोथळा बाहेर काढू, थोबाडीत मारू, जशास तसे उत्तर देऊ, माफ करणार नाही, तर हे चालणार नाही. रवी राणा दबणारा नाही. माझं नाव वापरून ते सरकारवर दबाव निर्माण करीत आहेत. मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी ते माझा आधार घेऊन हे दबावतंत्र वापरत आहेत, असे आमदार राणा म्हणाले.

रवी राणांचं वक्तव्य मी मिडियावर पाहिलंय. बच्चू कडूला घरात घुसून मारणार, त्याला निवडणुकीत पाडणार. कालच्या सभेत मी सार्वत्रिक बोललो की, आपण राणांचे आभार मानले, आपलेही शब्द मागे घेतले. पण हे न ऐकता केवळ ‘कोथळा बाहेर काढू’, येवढेच त्याने लक्षात ठेवले. हे काही राणांना उद्देशून म्हटलेच नव्हते, तर ‘भविष्यात कुणी असे आरोप केले तर...’, असा त्याचा अर्थ होता. पण त्यानंतर राणाने जे वक्तव्य केले, ते म्हणजे मुद्दामहून हा विषय पुढे रंगवण्याचा प्रयत्न आहे. राणा हे माझ्याबद्दल व्यक्तिगत बोललेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यावर कुठलीही कॉमेंट करू नये, असे बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu : रवी राणांबद्दल विचारताच बच्चू कडू म्हणाले, ‘ते स्वतःच तेवढं वात्रट आहे...’

तू तलवार घेऊन येशील, तर मी फुल घेऊन येईल...

माझ्या शरीराचे किती तुकडे राणाला करायचे आहे, ते करावे. पण मी महाराष्ट्राला हे सांगू इच्छितो की, आपणच अशी लढाई करीत बसलो, तर शेतकऱ्यांची लढाई, दिव्यांगांची लढाई कोण लढणार? हे प्रश्‍न मागे पडतील, कदाचित त्याचा हेतू तसा असू शकतो आणि राणाला काहीही वाटत असेल तर मी ५, ६ आणि ७ नोव्हेंबरला कुरळ पूर्णालाच आहे. त्याला वाटत असेल की कुरळ पूर्णा लांब आहे. तर त्याने कोणत्याही चौकात यावे. त्याने तलवार घेऊन यावे, मी फूल घेऊन जाणार. त्याच्या तलवारीचा वार बच्चू कडू छातीवर झेलायला तयार आहे. कारण आता हा वाद अधिक वाढवायचा नाही आहे. कारण बरीच कामे करायची आहे. त्यामुळे पुन्हा मी शांततेचे एक पाऊल पुढे टाकणार आहे. नाहीच तर माझं रक्त वाहून द्यायला मी तयार आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com