भोंगा, हनुमान चालिसा नव्हे, तर शाळा आणि रुग्णालय महत्वाचे...

...तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं, असे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टिका केली.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

अमरावती : कुणाचा भोंगा कुठे वाजवावा आणि हनुमान चालिसा कुठे म्हणावी, की म्हणू नये, यातच काही नेत्यांची शक्ती खर्ची पडत आहे. हनुमान चालिसा वाल्यांनी विनाकारण हो हल्ला करण्यापेक्षा शाळा आणि रुग्णालये मजबूत करण्यासाठी आपली शक्ती खर्ची घातली असती, तर लोकांना त्यांना डोक्यावर घेतलं असतं, असे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टिका केली.

अमरावती (Amravati) येथे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) जयंतीनिमित्त बुधभूषण ग्रंथाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यात बोलत असताना राज्यमंत्री कडू (Bacchu Kadu) म्हणाले, दोन वर्ष कोरोनाचा काळ बघितल्यानंतर आपले रुग्णालय कसे मजबूत होती, आपल्या शाळा कशा मजबूत होतील, यावर आज काम करणे गरजेचे आहे. त्या दोन वर्षांच्या वेदनांतून तुम्ही बाहेर पडून हनुमान चालिसावर राजकारण करत असाल, तर हे तुमच्या राजकारणाचे अपयश आहे. अशा मुद्द्यांपेक्षा विकासाचे मुद्दे नेत्यांनी समोर आणले पाहिजे.

आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, इतर गोष्टी बोलू नये. पण आज ते बोलण्याची वेळ आलेली आहे. आजही आपले रुग्णालय संपन्न नाहीत. इर्विन हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितले तर एका बेडवर दोन रुग्ण झोपलेले आढळतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे. कुणाचा भोंगा कुठे वाजवावा, हे महत्वाचे नाही, असे म्हणत बच्चू कडूंनी राज ठाकरेंसह विरोधी पक्षालाही टोला लगावला. अशा जयंतीच्या दिवशी नेत्यांनी हॉस्पिटल दत्तक घेतले पाहिजे, असे सांगत मराठा सेवा संघ आणि प्रहार दोघांनी मिळून एखादे हॉस्पिटल दत्तक घेऊ आणि एक नवीन विचार देशासमोर घेऊन जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

सेवा हाच खरा धर्म आहे. आपले राज्य हे छत्रपतींचे राज्य आहे. त्यांनी तलवार चालवली, रक्त सांडले. पण मन मात्र हळवं होतं. सामान्य लोकांप्रति छत्रपतींचा आस्था तेवढीच मजबूत होती. कुणाच्या पिकाच्या देठालाही हात लावू नका, असे सांगणारा हा जगातला पहिला राजा होता. कारण त्याला सेवेचा आधार होता. राज्य कुणाच्या नावाने आहे, हे फार महत्वाचे नाही. या परिस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते म्हणायचे, ‘सर्वप्रथम आम्ही भारतीय आहो’. आज हाच विचार देशासाठी महत्वाचा आहे, असे ते म्हणाले.

Bacchu Kadu
बच्चू कडू यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

राज्य कुणाचे ?

आज कुणी म्हणतं की, औरंगजेबाचे राज्य आहे, मोदींचे राज्य आहे, तर कुठे उद्धव ठाकरेंचे राज्य असे म्हटले जाते. पण छत्रपतींचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, हे आपल्यासाठी आज महत्वाचं आहे. हे रयतेचे राज्य आहे, रयतेसाठी आहे आणि रयतेसाठीच आम्ही काम केले पाहिजे, असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com