Bawankule : सात न्यायाधीशांकडे का जायचे आहे? उद्धव यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य करावा !

Supreme Court : सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो त्यांनी मान्य करावा.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले. त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले सत्तासंघर्षाच्या प्रकरणात ही सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठात व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सात न्यायाधीशांकडे का जायचे आहे? त्यांची सत्ता संघर्षावर पाचऐवजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो त्यांनी मान्य करावा. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण यावर भाष्य करणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

बावनकुळे म्हणाले, सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राजकीय व्यक्तीने बोलणे योग्य होणार नाही. निकालाची वाट पहावी. आमचे सरकार भक्कम आहे. उद्या बहुमत सिद्ध करायला सांगितले तर १८४ पेक्षा जास्त मते मिळतील. उद्धव ठाकरे यांना पाच न्यायाधीशांच्या खंडपीठावर का विश्वास नाही, त्यांना सात न्यायाधीशांकडे जायचे आहे, या प्रश्नावर बावनकुळे यांनी ते त्यांनाच विचारा असा सल्ला दिला.

जे खंडपीठ असेल, त्याचा येणारा निर्णय मान्य करायला हवा. भाजप कुठल्याही निर्णयाला तयार आहे. काँग्रेसच्या काळात भाजपच्या राज्यातील सरकार बरखास्त केले होते. आम्ही कधीही असे प्रयत्न केले नाही. आमदारांचे भविष्य धोक्यात होते, म्हणून ते सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. महाराष्ट्राचे सरकार गेले ते उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागण्यामुळे. आता खोक्याचा विषय काढून ते सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Chandrashekhar Bawankule
Bawankule : गिरीष बापट यांच्या जिवाशी खेळ केला जातो आहे, या आरोपावर बावनकुळे म्हणाले...

खोके कोण घेत होते हे शिवसेनेच्या (Shivsena) सर्व आमदारांना चांगले ठावूक असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खिशातून पेन निघत नव्हता. मंत्रालयातही ते येत नव्हते. त्यामुळे आमदारांनी आपल्या अस्तित्वासाठी नवे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी याचे आत्मचिंतन करावे. सकाळचा भोंगा बंद करावा. नाही तर किंचित सेनेत चारच माणसे उरतील, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com