बावनकुळे म्हणाले, ...म्हणून पेंग्वीन सेना घेऊन ते 'टीव टीव' करीत आहेत; केजरीवालांवरही टिका !

त्यामुळे ते इतरत्र पाय पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी त्यांची भूमिका हिंदुत्वविरोधी राहिली आहे. मग आजच त्यांना कशी काय जाग आली, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेले नोटांवर देवी, देवतांचे फोटो असावे, हे विधान आणि काल प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यासह सत्तापक्षावर डागलेली तोफ, यांवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि उद्धव ठाकरेंनाही खडे बोल सुनावले आहेत.

नागपुरातील (Nagpur) इतवारी परिसरात आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची ही नौटंकी आहे. ही नौटंकी केल्यावर राज्यातून, देशभरातून अनेक प्रतिक्रिया येतील, हे ते जाणून आहे. त्यामुळे त्यांनी ही एक पुडी सोडून दिली आहे. आता ही पुंगी वाजत राहील. हिंदू देवतांचे फोटो नोटांवर यावे, असे विधान त्यांनी केले आहे. गुजरात (Gujrat) आणि इतर राज्यांत हिंदुत्ववाद्यांची मते मिळावी, असा त्यांचा यामागचा उद्देश आहे. पण त्यांच्याच राज्यात दिल्लीत (Delhi) लोक त्यांना कंटाळले आहेत. त्यामुळे ते इतरत्र पाय पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी त्यांची भूमिका हिंदुत्वविरोधी राहिली आहे. मग आजच त्यांना कशी काय जाग आली, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

महाविकास आघाडीतील नेत्यांना अडीच वर्ष संधी होती. त्या संधीचे सोने करण्याऐवजी त्यांनी माती केली. आता पेंग्वीन सेना घेऊन त्यांची टीव टीव सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्याच्या बांधावर जाणे म्हणजे एक इव्हेंट आहे. शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल त्यांना माहितीच काय आहे? सरकारमध्ये असताना त्यांनी एनडीआरएफच्या संदर्भात काहीही मदत केली नाही. आता ओरडून काय फायदा? आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. या सरकारने एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली आहे. अशी कामे ठाकरेंच्या आवाक्याबाहेरची आहेत. त्यामुळेच त्यांनी अडीच वर्षांत सरकार घालवले आणि आता घरी बसले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ पंजात आहे !

फेसबुक लाईव्ह न करता तेव्हाच राज्यभर संपर्क ठेवला असता आणि आपले आमदार सांभाळले असते, तर आज टीव टीव करण्याची वेळ ठाकरेंवर आली नसती. शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले असता, आमचे १६४ पेक्षा जास्त आमदार आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे आमदार टिकून रहावे, म्हणून ते असे वक्तव्य करीत आहेत. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी राज्याचा दौरा केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमच्याकडे येत आहेत. आता ते त्यांचा फ्लो कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com