बच्चू कडूंची खंत : राजकारण्यांना जनतेच्या वेदनांशी देणेघेणेच राहिलेले नाही !

भोंग्यातून हॉस्पिटलचा नारा आला असता तर तो जनहिताचा असता. पण आज प्रत्येकाच्या भोंग्यातून त्याच्या-त्याच्या स्वार्थाचे नारे निघत असल्याबद्दल बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दुःख व्यक्त केले.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

अकोला : कोरोनाच्या काळात तब्बल दोन वर्षे आम्ही हॉस्पिटल्ससमोर पाय घासत होतो. अन् आता परिस्थिती सुधारायला लागताच आम्ही ते विसरलो. आता खुर्चीसाठी राजकारण, येवढंच काय ते आम्हाला माहिती आहे, अशा शब्दांत खंत व्यक्त करीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तमाम राजकीय नेत्यांवर निशाणा साधला.

अकोल्यात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, राजकारण्यांना (Political Leaders) जनतेच्या वेदनांशी काहीही संबंध राहिलेला नाही. फक्त खुर्ची साठी राजकारण करणं आम्हाला माहीत आहे. कोरोना काळात दोन वर्षे आम्ही हॉस्पिटलसमोर बेडसाठी ऑक्सिजनसाठी पाय घासत होतो आणि आज ते सर्व विसरलो. आम्ही एवढे अपरिपक्व आहोत, अयशस्वी आहोत की आमच्या डोक्यात भोंगा आला, हनुमान चालिसा आली. हे आजच्या राजकारणाचे (Politics) सर्वात मोठे अपयश आहे, असे सांगत त्यांनी आज राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

ज्या वेदना आम्हाला झाल्या, त्याचे आज कुणालाही काहीही पडलेले दिसत नाही. कुणाची माय मेली, तर कुणाचा बाप गेला. त्यामुळे आज भोंग्यातून हॉस्पिटलसाठी नारा आला असता, तर वाटलं तरी असतं की राजकारण्यांचे डोके अजून शाबूत आहेत. मात्र आज भोंग्यातून आम्ही दाखवून दिलं की आमची जातच राजकारणी आहे. राजकारण्यांना जनतेच्या वेदनेशी काहीही संबंध नाही. फक्त खुर्ची साठी राजकारण करणं आम्हाला माहीत आहे. खरी गरज काय होती तर भोंग्यातून हॉस्पिटलचा नारा आला असता तर तो जनहिताचा असता. पण आज प्रत्येकाच्या भोंग्यातून त्याच्या-त्याच्या स्वार्थाचे नारे निघत असल्याबद्दल बच्चू कडू यांनी दुःख व्यक्त केले.

Bacchu Kadu
'लाज वाटत नाही का तुम्हाला?'; बच्चू कडूंनी राणा दांपत्याची लाज काढली....

ओवेसी आला अन् औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले, भाजपने चालिसा म्हटली तर राज ठाकरे यांनी भोंगे मधात आणले. कोरोना पुन्हा येऊच नये, मात्र पुन्हा तशी परिस्थिती उद्भवली तर दवाखान्यांचे काय, यासाठी कुणी समोर येताना दिसत नाही. पण आमची प्रहार संघटना आणि मराठा सेवा संघ मिळून हॉस्पिटल दत्तक घेण्याचे प्रयत्न करीत आहोत. हे बघून तरी कुणाला सुबुद्धी यावी, असे ते म्हणाले. दरम्यान नारायण राणे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांवर रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तसे नारायण राणे सत्य बोलले. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बरोबरी करूच शकत नाहीत, असे बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com