
अमरावती : आमदार रवी राणांनी आमदार बच्चू कडूंवर गुहाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप केला होता. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात घमासान सुरू होते. राणांच्या या आरोपावर आमदार बच्चू कडूंनी आता खूपच आक्रमक भूमिका घेतली आहे. एकप्रकारे त्यांनी शिंदे फडणवीस सरकारलाच आव्हान दिले आहे.
आमदार कडू म्हणाले, "गुहाहाटीला मीच नाही तर एकूण पन्नास आमदार गेलो होतो. राणांच्या आरोपानंतर मला सात ते आठ आमदारांचा फोन आला. राणांनी केलेल्या आरोपावर त्यांनी पुरावे द्यावे, नाहीतर आम्ही वेगळा निर्णय घेऊ. एखाद्यावर आरोप करून त्यांचं अस्तित्व पणाला लावणं, हे चुकीचं आहे, असेही कडू म्हणाले.
आम्ही एक तारखेपर्यंत पुरावे मागितले आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत, नाहीतर आम्ही सात ते आठ आमदार वेगळा निर्णय घेऊ,ठ असा इशाराच त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे.
यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. रवी राणांच्या आरोपांमुळे शिंदे - फडणवीस सरकारमधले आठ आमदार नाराज झाले आहे का? शिंदे फडणवीस सरकारमधील हे आठ आमदार वेगळी भूमिका घेतील का? काही आमदारांचा सरकारविरोधी सूर उमटतो आहे का? सरकारमध्ये बच्चू कडू समर्थक एक वेगळा गट तयार झाला आहे का? इत्यादी प्रश्नांची चर्चा आता होत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.