Bachchu Kadu News: लिलावात कुणी आले तर हात, पाय तोडू, अन् सुनील केदारांवर पहिले कायदेशीर कारवाई करा !

Nagpur : शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Bacchu Kadu News : आज सकाळी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर धडकले. यावेळी कार्यकर्त्यांसह शेतकरीही त्यांच्यासोबत होते. नागपूर जिल्हा सहकारी बॅंक शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव करीत आहे. याविरोधात बच्चू आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी लिलाव प्रक्रिया उधळून लावली.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लिलावात सहभागी होणाऱ्यांचे हात पाय तोडू, असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले. यावेळी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन २००३ मध्ये झालेल्या १३० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात चौकशी करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली.

काँग्रेस नेते आमदार सुनील केदार यांचा या घोटाळ्यातला सहभाग यासंदर्भात ही कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मालमत्तांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याचा निषेध करण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तांच्या जप्तीला स्थगिती देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्‍नांवर प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नेहमीच आक्रमक असतात. जगावेगळी आंदोलने करून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हा बॅंकेच्या प्रशासकांनी शेतकऱ्यांची संपत्ती लिलावात काढण्याची नोटीस दिल्यानंतर ते आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी लढा सुरू केला आहे. यामध्ये त्यांनी माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे या आंदोलनातून ते केदारांना अडचणीत आणतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Bacchu Kadu
Bacchu Kadu : २०२४ मध्येच होणार मंत्रिमंडळ विस्तार, ‘जो जितेगा, वही बनेगा मंत्री’

नागपूर, वर्धा तसेच बुलढाणा जिल्हा बॅंक थकीत कर्जाची वसुली तसेच अनागोंदी कर्ज वितरण प्रक्रियेमुळे अडचणीत आल्या होत्या. राज्य सरकारने या तीनही बॅंका अवसायानात आल्याचे जाहीर करीत त्यांचे व्यवहार थांबविले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यानंतर बॅंकांच्या व्यवहाराला काही अंशी परवानगी देण्यात आली. या काळात बॅंकेच्या थकीत कर्जदाराकडून वसुलीचे काम हाती घेण्यात आले.

थकीत कर्जदारांना नोटीस बजावत प्रशासकांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न चालवला आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल ३०० शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे. तशा नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये वेणूबाईं पाचपोहर यांचे नातेवाईक सागर वामनराव पाचपोहर यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली होती. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती.

Bacchu Kadu
Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड : सरन्यायाधीशांचा सवाल; ठाकरे गटाच्या वकिलांनी सुचविला ‘हा’ तोडगा

तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. त्यानंतरच्या काळात हे पोर्टल बंद करण्यात आले. कोरोना (Corona) काळात हा विषय पुन्हा मागे पडला. आता बॅंकेने थेट लिलाव सुरू केला आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्यांच्या अडचणी वाढणार आहेत. परिणामी कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी पाचपोहर कुटुंबीयांनी आमदार कडू यांच्याकडे केली आहे. वन टाइम सेटलमेंट किंवा इतर योजनांतून अशा शेतकऱ्यांना (Farmars) दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी (Bacchu Kadu) आज आंदोलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com