'वसुली प्रकरणात अनिल देशमुख फसवले गेले'

प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणी खळबळजनक दावा केला आहे.
'वसुली प्रकरणात अनिल देशमुख फसवले गेले'

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १०० कोटी वसुली प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. माझी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की, त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. त्यांनी कायद्याला सहकार्य केले तर ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.

उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणावरुन प्रकाश आंबेडकरांनी हा दावा केला आहे. नागपूर येथील रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ''या प्रकरणात दाखवलं एक जातय आणि करतयं दूसरचं, असा प्रकार सुरु आहे. आता हा प्रकार थांबवला पाहिजे, असं मला वाटतय, अन्यथा राज्यपालांनी यात लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा,'' अशी मागणी आम्ही करणार आहोत, अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे.

'वसुली प्रकरणात अनिल देशमुख फसवले गेले'
मलिकांच्या पत्रकार परिषदांना वैतागल्या अमृता फडणवीस म्हणाल्या, बिगड़े नवाब ने...

''अनिल देशमुख या प्रकरणात फसले गेले आहेत, कलेक्शन झाले असल्याची माहिती विभागाकडून मिळते. पण चौकशी यंत्रणेला देशमुखांकडे पैसे मिळालेले नाही, मग हे पैसे कोणाकडे गेले, वसुलीतून जे पैसे जमा झाले, ते कोणाकडे गेले, याचा खुलासा अनिल देशमुखांनी करायला हवा. त्यांनी कायद्याला सहकार्य केल्यास, ते माफीचा साक्षीदार होऊ शकतात आणि त्यांची सुटका होऊ शकते. १०० कोटी वसुली प्रकरणात मोहरे समोर येत आहेत; पण मुख्य वजीर आणि राजा समोर येत नाही. पोलीस यंत्रणाही त्यांना समोर आणत नाही. त्यामुळे राज्यपालांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे,'' असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राजकारणाच्या दर्जावरही आपले मत व्यक्त केले. एकेकाळी राजकारणाकडे सेवा म्हणून बघितले जात होते. पण आता राजकारणही व्यावसायिक झाले असून त्यात गुन्हेगारीही वाढली आहे, त्यातून राज्य लुटले जात आहे. त्यामुळे न्यायालयाची भूमिका आता महत्त्वाची झाली आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आतातरी न्यायालयाने राजकीय भ्रष्टाचाराची प्रकरणे ताबडतोब निकाली काढावीत, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com