...आणि म्हणून संतप्त कामगार शरद पवारांच्या घरावर चालून गेले !

ते संतप्त लोक शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरात घुसले आणि पोलिसांनाही ते जुमानले नाहीत. कारण ५ महिन्यांपासून पगार नसणारे हे कामगार आहेत, असे अनिल बोंडे म्हणाले.
Anil Bonde and Sharad Pawar
Anil Bonde and Sharad PawarSarkarnama

अमरावती : आज दुपारी संतप्त एस.टी. कामगार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानावर धडकले. तेथे त्यांनी घरावर दगडं आणि चपला भिरकावल्या. त्यानंतर राज्यभर त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शरद पवारांमुळे हे सरकार अस्तित्वात आले आणि सरकारला हलवायचे असेल तर, पवारांना लक्ष्य करावे लागेल, या विचाराने संतप्त कामगारांनी पवारांच्या घराला लक्ष्य केल्याचे भाजप नेते राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. बोंडे (Anil Bonde) म्हणाले, शरद पवारांचे (Sharad Pawar) शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहेत. फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये राजाला शेतकऱ्यांनी, कामगारांनी भर चौकात आणून फाशी दिली होती. त्याचीच थोडीफार प्रमाणात पुनरावृत्ती आज महाराष्ट्रात (Maharashtra) पहायला मिळाली. एस.टी.चे संतप्त कामगार गेल्या पाच महिन्यांपासून संपावर आहे. ते संतप्त लोक शरद पवारांच्या घरात घुसले आणि पोलिसांनाही ते जुमानले नाहीत. कारण ५ महिन्यांपासून पगार नसणारे हे कामगार आहेत, किराणा न मिळू शकलेले हे कामगार आहेत. त्यांच्या १२५ सहकाऱ्यांनी आत्महत्या केलेले हे कामगार आहेत.

दुर्दैवाने शरद पवार साहेबांचं सरकार इतकं रग्गेल झालेलं आहे, इतकं अहंकारात गेलेलं आहे, की परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल म्हटलं की, ५ महिन्यांच्या संपाने काय फायदा झाला. तिकडे शिवसेना नेते संजय राऊत ईडीची नोटीस येते म्हणून स्वतःचे स्वागत करवून घेतात. नवाब मलिकांचे देशद्रोह्यासोबत संबंध असतानाही रग्गेलीने महाराष्ट्राच्या छाताडावर पाय ठेवून सांगतात की, मी राजीनामा देणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता तर खवळलीच आहे. पण ५ महिन्यांपासून सतत दुःख झेलणारे, शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपमानित होणारे हे कामगार तापले आणि आजची घटना घडली, असे ते म्हणाले.

Anil Bonde and Sharad Pawar
हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया : म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण..."

एस.टी. कामगारांना कळून चुकले होते की, हे सरकार हलतं फक्त शरद पवारांच्या विचाराने आणि त्यांच्या कृतीने चालते. जोपर्यंत पवारांना आपण हालवत नाही, तोपर्यंत सरकार हालणार नाही, म्हणून हे सगळं अराजक निर्माण झालं आणि तेसुद्धा पवारांमुळे झालेलं आहे. महाराष्ट्रातले शेतकरी, कामगार त्यांच्यावर केव्हा तुटून पडतील, याचा नेम नाही. आता त्यांनी जाहीर केले पाहिजे की, या राज्यात जेथे माझीच सुरक्षा नाही, तर सर्वसामान्य जनतेच काय? त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी, असे डॉ. बोंडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com