Abdul Sattar : संजय राऊतांनी उद्ध्वस्त केले शिवसेनेचे साम्राज्य...

Sanjay Raut : परिणाम काय होणार याची जाणीव न ठेवता राऊत बोलत असतात.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

Abdul Sattar on Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची अवस्था फार वाईट झाली आहे. शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागला. पण निवडणूक आयोगाने दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या पदरात टाकले. या सर्व परिस्थितीला खासदार संजय राऊत जबाबदार आहेत, असे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. सत्ता म्हणाले, शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊत आहेत. राजकारणाचे समीकरण कुठे जोडायचे, कसे जोडायचे, काय बोलायचं, कुठे बोलायचं, त्याचे परिणाम काय होणार याची जाणीव न ठेवता राऊत बोलत असतात. संसदीय पदाच्या व्यक्तीबद्दल त्यांनी सन्मान ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करणे चुकीचे आहे.

समाजकारण आणि राजकारण करीत असताना काहीही बोलून चालत नाही. ‘ते विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे’, असे वक्तव्य करून राऊतांनी नवा वाद निर्माण केला आहे. आताही ते आपल्या वक्तव्यावरून मागे हटायला तयार नाहीत. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. ज्याला कुणाला चोर म्हणायचे होते, ते त्यांनी नाव घेऊन म्हणायला पाहिजे होते. सरसकट विधिमंडळाला चोर म्हणणे चुकीचे आहे. हे प्रकरण त्यांच्या अंगलट येणार आहे, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

पुणे शहरातील कसबा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या पराभवाबाबत विचारले असता, राजकारणात जय पराजय होत असतात. कसब्याच्या पराभवाचे चिंतन आणि मनन आवश्यक आहे. पराभवाचे मूळ कारण काय हे शोधले जाईल आणि भविष्यात ते पुन्हा होऊ नये याची दक्षता घेतली जाईल. कसब्याच्या एका विजयाने कॉंग्रेस हुरळून गेली आहे. त्यांनी जास्त हवेत जाऊ नये. कारण ही पोटनिवडणूक आहे. सार्वत्रिक निवडणुकीत (Election) त्यांना त्यांची जागा कळेल, असेही सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

Abdul Sattar
Abdul Sattar News: विमा कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना भरपाईचा विचार!

शिवसेनेच्या (Shivsena) (शिंदे गट) धनुष्यबाण यात्रेबाबत विचारले असता, पक्षाचा विचार सर्व सामान्य माणसापर्यंत जावा यासाठी आम्ही लोकांपर्यंत जाऊ. नव्याने पक्षप्रमुख झाल्याने त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जनसंपर्क करण्यात येईल. सर्वसामान्य माणसाशी संवाद साधायचा आहे, त्यासाठी धनुष्यबाण यात्रा चालू होणार आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) सर्व जिल्ह्यांतून, तालुक्यांतून ही यात्रा जाणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत ही यात्रा मोठे योगदान देणार आहे, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com