
जळगाव : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळाले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून त्याचे क्रेडिट घेतले; मात्र आता आरक्षण घालवलं त्याचा ढोल का वाजवत नाही? असा टोला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. (OBC Reservation laps is a credit of present state Government)
जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो अत्यंत दुर्दैवी आहे, ओबीसींवर अन्याय करणारा आहे. सरकारला माझी विनंती होती, की ९२ नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणात व्हाव्यात. त्या जर आरक्षणाविना झाल्या तर ते योग्य होणार नाही. सरकारने आपली असेल नसेल ती शक्ती पणाला लावून तसेच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून ओबीसी आरक्षण मिळवून द्यावे, असेही श्री. खडसे म्हणाले.
मंत्रिमंडळ स्थापन होणे गरजेचे
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खडसे म्हणाले, की महाराष्ट्राची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे, आज अनेक भागात पूर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची गरज आहे.
विधान परिषदेत शिवसेनेत फूट नाही
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत ते म्हणाले, विधानपरिषदेतील आमदार आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. विधानसभेत जे शिवसेनेचे आमदार फुटले त्यांनी काय केले हे जनतेसमोर आहेच. मात्र विधानपरिषदेत शिवसेनेचे आमदार त्यांच्या सोबत आहेत. विधानपरिषदेत त्यांचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पद त्यांच्याकडेच राहिले, ते आमचे सहयोगी पक्ष आहेत.
------
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.