ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेऊ नयेत, ही सरकारची इच्छा!

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विधानसभेत प्रस्ताव आणणार.
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

Sarkarnama

नाशिक : मध्य प्रदेश सरकारने ओबीसी (OBC) समाजाचे राजकीय आरक्षण वगळून निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव त्यांच्या विधानसभेत केला आहे. अशाच प्रकारचा ठराव महाराष्ट्र विकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) विधानसभेत आणणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal</p></div>
Dhule Garbage : कचरा नव्हे सोने, त्यात राजकारण्यांचा पार्टनर लॉबीचा फॉर्म्युला?

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेऊ नयेत हा निर्णय सर्व पक्ष एकमताने घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, भारत सरकारने ओबीसी आरक्षणाविषयी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेला साथ देण्यासाठी राज्य सरकारदेखील सामील होईल.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal</p></div>
पोलिस आयुक्त पांडेच्या समजपत्राचा बाण भाजपच्या जिव्हारी लागला!

ते पुढे म्हणाले, देशात ओबीसी समाज हा ५४ टक्क्यांवर आहे. त्यामुळे हे राजकीय आरक्षण न मिळाल्यास पुढील पाच वर्ष कोणत्याही संस्थेत ओबीसींना प्रतिनिधीत्व राहणार नाही. यामुळे मोठा रोष ओबीसी समाजात निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठीच भारत सरकारने पुनर्विचार याचिका सादर केली आहे. याशिवाय हा विषय लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने जो आयोग तयार केला आहे त्यामार्फत काम सुरू झाले आहे. आयोगाला लागणारा आवश्यक निधी देण्याबाबत राज्य सरकार सकारत्मक असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com