Jaykumar Rawal: सारंगखेडा, सुलवाडे, प्रकाशा बॅरेजची गळती थांबवा

आमदार जयकुमार रावल यांची विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे मागणी
Jaykumar Rawal
Jaykumar RawalSarkarnama

धुळे : तापी नदीवरील (Tapi river) सुलवाडे, सारंगखेडा (Sarangkheda) व प्रकाशा बॅरेजेसना (Prakasha barrages) मोठ्या प्रमाणावर गळती (leakage) लागली असून, त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ही गळती अशीच सुरू राहिली, तर तापी काठावरील गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही गळती तत्काळ थांबवावी, अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल (Jaykumar rawal) यांनी विधानसभेत केली. (Prakasha & other barrages leakage is a serious issue)

Jaykumar Rawal
Ambadas Danve: शिवसेना गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम करेल!

तापी नदीवरील सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा ही बॅरेजेस झाली आहेत. या बॅरेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा असतो. हे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी, तसेच अनेक गावांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या बॅरेजेसचे दरवाजे लोखंडी असल्याने व ते कायमस्वरूपी पाण्यात राहिल्याने गंजत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या बॅरेजेसना गळती लागली होती.

Jaykumar Rawal
काँग्रेसच्या अडचणीत भर; मल्लिकार्जुन खर्गेनांही ईडीने बोलावले

या गळतीमुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचेही दिसून आले. एवढा प्रचंड खर्च करून बनवलेले हे बॅरेजेसचे पाणी वाया जात असल्याने ही गळती थांबविण्यासाठी काहीही प्रयत्न होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने आमदार रावल यांनी ही गळती तत्काळ थांबवावी, अशी मागणी श्री. रावल यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे केली.

उपमुख्यमंत्र्यांकडून ग्वाही

उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारंगखेडा बॅरेज प्रकल्पाच्या लोखंडी दरवाजांवर अधो बाजूस असणारा प्रकाशा बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यावर उभ्या उचलद्वारांचा १.२५ मीटर भाग अधोबाजूस पाण्याखाली राहतो. यामुळे द्वारांचा खालील भाग पॅनेल १ गंजून खराब झाला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना कोणताही धोका नाही. सारंगखेडा बॅरेजवरील द्वार निरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने वर्गवारी १ त्रुटींबाबत दुरुस्तीसाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार थोपद्वारे उच्चप्रतीचे गंजरोधक रंगकाम करण्याचे सुचविले आहे.

हे काम करताना पॉलिन, होईस्ट ब्रिज, होईस्ट ॲरेजमेंट, स्टेअर केस आदी भागांची स्वच्छता करून गंजरोधक रंगकाम तातडीने करणेबाबत सुचविले आहे. पावसाळ्यानंतर निरीक्षणाचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार तिन्ही बॅरेजेसच्या देखभाल दुरुस्तीचे काम घेणे नियोजित आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितल्याचे आमदार श्री. रावल यांनी म्हटले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com