Ambadas Danve; महाराष्ट्राचा नव्हे फक्त कंत्राटदारांचा विकास होतो आहे!

मुंबई महापालिकेच्या निविदा प्रक्रीया राबवितांना मोठा भ्रष्टाचार झाला असुन महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचे काम सुरु आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

मुंबई : मुंबई (Mumbai) महापालिकेने केलेल्या चांगल्या कामाला सत्ताधारी वाईट म्हणत आहेत. शिवसेनेने (Shivsena) केलेल्या जुन्याच कामांची आपले म्हणत टिमकी वाजविण्याचे त्यांचे काम सुरु आहे. यानिमित्ताने मोठा भ्रष्टाचार (Corruption) होत असुन मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. (State Government keep aside all rules in tenders of Mumbai)

Ambadas Danve
Shrikant Bhartiy; राज ठाकरे यांचे विधान हा मुंबईचा अपमान!

भाजप सदस्य प्रविण दरेकर यांनी नियम 260 अन्वये माडंलेल्या प्रस्तावावरील चर्चेत विविध सदस्यांनी भाग घेतला. त्याचे वाभाडे काढणारे भाषण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणावर प्रखर टिका केली.

Ambadas Danve
Abdul Sattar News: बांधावर गेलेल्या सत्तारांचे मदतीबाबत तोंडावर मात्र बोट!

आमदार दानवे म्हणाले, कालच राज ठाकरे यांनी मुंबईत भाषण करताना शहरातील सुशोभिकरणाचे वाभाडे काढताना डान्स बार मध्ये बसल्यासारखे वाटते असे म्हटले आहे. हे विधान पुरेसे बोलके आहे. सत्ताधाऱ्यांनी पाच हजार कोटींच्या निविदा काढल्या होत्या, त्या सहा हजार दहा कोटींवर कशा गेल्या?. त्यात आठ टक्के वाढ कशी झाली. यानिमित्ताने तेराशे कोटी रुपये आगाऊ देण्यात आले. मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचे काम होते आहे. त्यामुळे जाहिराती काहीही असल्या तरीही विकास महाराष्ट्राच नव्हे तर फक्त कंत्राटदारांचा होतो आहे.

मुंबई शहरासाठी चाळीस हजार बाकडे खरेदी केले जाणार आहेत. फर्नीचर खरेदी केली जाते आहेत. सुशोभिकरण केले जाते आहे. रस्त्यांची कामे आहेत. अगदी वेंडींग मशीनच्या खरेदीत देखील अव्वाच्या सव्वा दर देऊन भ्रष्टाचार झाला आहे. रेल्वेच्या जागा संपादन करताना झोपडपट्टीवासीयांना बेघर करण्याचे काम सुरु आहे. विकासाचे हे धोरण व कामकाजाची पद्धत कोणाच्या इशाऱ्याने होते आहे. यात मुंबई शहराचे काय हित आहे, हे स्पष्ट करावे.

Ambadas Danve
Shocking News: `राष्ट्रवादी`च्या शहराध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल!

मुंबई शहरातील कोस्टल रोडची टिमकी राज्य सरकार वाजवत आहे. हा प्रकरा म्हणजे स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आहे. यातील सत्तर टक्के काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी समुद्राचे पाणी डिसाल्टेशन करण्याचा प्रस्ताव आणला होता, तो गुंडाळून का ठेवला आहे. महापालिकेच्या निधीवाटपात मोठा दुजाभाव होत असुन त्यात सरकारचा थेट हस्तक्षेप आहे. भाजपचे सदस्य असलेल्या प्रभागाततीन कोटी तर अन्य पक्षाचे सदस्य असलेल्या प्रभागांत एक कोटींचा निधी दिला जात आहे. सदस्य कोणीही असो, ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. लोकांसाठी सर्व कामे होतात. त्यात सरकार दुजाभाव का करते, असा प्रश्न त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com